AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 5 लोकांपासून कायम दूर रहावे, अन्यथा आयुष्यातील अडचणी वाढतच जातील

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात या जगात असे काही लोक असतात, त्यांच्यापासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. अशा लोकांसोबत केलेली जवळीक तुम्हाला महागात पडू शकते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या 5 लोकांपासून कायम दूर रहावे, अन्यथा आयुष्यातील अडचणी वाढतच जातील
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 8:07 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी म्हटलं की जगातील सर्वच लोक हे चांगले असतात असं नाही किंवा जगातील सर्वच लोक हे वाईट असतात असं देखील नाही. त्यामुळे तुम्हाला चांगली माणसं आणि वाईट माणसं यातील फरक ओळखता आला पाहिजे. ज्या लोकांना हा फरक ओळखता येतो, अशी लोक आयुष्यात यशस्वी होतात. मात्र ज्या लोकांना आपल्यासाठी चांगलं कोण? वाईट कोणं यातील फरक ओळखता येत नाही, त्यांचं भविष्यात फार मोठं नुकसान होतं. अशी लोक कोणावरही लगेच विश्वास ठेवतात. पुढे अशा लोकांचा विश्वासघात होण्याची शक्यता असते. मात्र त्यावेळी तुमच्या हातातून वेळ निघून गेलेली असते. जगात असे काही लोक आहेत, ज्यांची संगत तुम्ही टाळली पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

नकारात्मक विचार करणारी माणसं – चाणक्य म्हणतात जे लोक सतत नकारात्मक विचार करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काही न काही चूक काढतातच. अशा लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे. कारण अशा लोकांमुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात जी लोक व्यसनाच्या आहारी गेलेली असतात, अशा लोकांसोबत कधीही मैत्री केली नाही पाहिजे. कारण तुम्ही जर अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलात तर तुमचं आयुष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हालाही व्यसनाची सवय लागू शकते.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, ते आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांसोबत मैत्री केली तर तुम्ही अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे.

दुटप्पी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक आपल्या वक्तव्यावर ठाम नसतात. अशा लोकांसोबत केलेली मैत्री महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांसोबत मैत्री करू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मत्सर करणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक तुमचा द्वेष करतात. जे लोक तुम्हाला आनंद झालेला असताना दु:खी होतात, अशा लोकांपासून नेहमी दूरच रहावे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.