AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 5 लोकांपासून कायम दूर रहावे, अन्यथा आयुष्यातील अडचणी वाढतच जातील

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात या जगात असे काही लोक असतात, त्यांच्यापासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. अशा लोकांसोबत केलेली जवळीक तुम्हाला महागात पडू शकते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या 5 लोकांपासून कायम दूर रहावे, अन्यथा आयुष्यातील अडचणी वाढतच जातील
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 8:07 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी म्हटलं की जगातील सर्वच लोक हे चांगले असतात असं नाही किंवा जगातील सर्वच लोक हे वाईट असतात असं देखील नाही. त्यामुळे तुम्हाला चांगली माणसं आणि वाईट माणसं यातील फरक ओळखता आला पाहिजे. ज्या लोकांना हा फरक ओळखता येतो, अशी लोक आयुष्यात यशस्वी होतात. मात्र ज्या लोकांना आपल्यासाठी चांगलं कोण? वाईट कोणं यातील फरक ओळखता येत नाही, त्यांचं भविष्यात फार मोठं नुकसान होतं. अशी लोक कोणावरही लगेच विश्वास ठेवतात. पुढे अशा लोकांचा विश्वासघात होण्याची शक्यता असते. मात्र त्यावेळी तुमच्या हातातून वेळ निघून गेलेली असते. जगात असे काही लोक आहेत, ज्यांची संगत तुम्ही टाळली पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

नकारात्मक विचार करणारी माणसं – चाणक्य म्हणतात जे लोक सतत नकारात्मक विचार करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काही न काही चूक काढतातच. अशा लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे. कारण अशा लोकांमुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात जी लोक व्यसनाच्या आहारी गेलेली असतात, अशा लोकांसोबत कधीही मैत्री केली नाही पाहिजे. कारण तुम्ही जर अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलात तर तुमचं आयुष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हालाही व्यसनाची सवय लागू शकते.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, ते आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांसोबत मैत्री केली तर तुम्ही अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे.

दुटप्पी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक आपल्या वक्तव्यावर ठाम नसतात. अशा लोकांसोबत केलेली मैत्री महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांसोबत मैत्री करू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मत्सर करणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक तुमचा द्वेष करतात. जे लोक तुम्हाला आनंद झालेला असताना दु:खी होतात, अशा लोकांपासून नेहमी दूरच रहावे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर