AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन गोष्टींपासून कायम दूरच राहा, आयुष्याचं कल्याण होईल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्यांच्यापासून मानसाने कायम दूर राहिलां पाहिजे, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या तीन गोष्टींपासून कायम दूरच राहा, आयुष्याचं कल्याण होईल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 9:35 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं, आयुष्यात काय करावं आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या समाजात तीन गोष्टी अशा आहेत, ज्या गोष्टींपासून मानसाने कायम दूर राहिलं पाहिजे. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. केवळ तुमचं आयुष्यच उद्ध्वस्त होत नाही, तर तुमचं आख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. मात्र तुम्ही जर या गोष्टींपासून दूर राहिलात तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

दुसऱ्याचं धन – चाणक्य म्हणतात माणसाने आयुष्यात कष्ट करावेत, कष्ट करून तुम्हाला हवं तेवढं धन कमवा, संपत्ती कमवा. आयुष्य आनंदात जगा. परंतु कधीही दुसऱ्याच्या धनावर, संपत्तीवर वाईट नजर ठेवू नका, तुम्ही एखाद्या व्यक्तीची फसवणूक करून जर धन कमावलं तर ते फार काळ टिकत नाही, आणि तुम्हाला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे.

पर स्त्री – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी आपल्या पत्नीसोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. परस्त्री ही नेहमी मातेसमान असते. जर घरात तुमची पत्नी असताना देखील तुमचं पाऊल समाजात वाकडं पडलं तर तुमचं आख्ख आयुष्य बरबाद होण्यासाठी फार वेळ लागत नाही. त्यामुळे काळजी घ्यावी.

संगत – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी वाईट लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण वाईट गोष्टी माणूस लगेच शिकतो, परंतु चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी खूप वेळ लागते. जर तुमची संगत चुकीची असेल तर तुमचं आयुष्य बरबाद होऊ शकतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक