AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार लोकांपासून सावधान, पाठीत खंजीर खुपसतात, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य म्हणतात समजात सर्व लोक सारखीच नसतात, काही लोक ही अतिशय चांगल्या स्वभावाची असतात, तर काही लोक हे धूर्त आणि कपटी असतात अशा लोकांपासून आपल्याला आपला बचाव करता आला पाहिजे.

Chanakya Niti : या चार लोकांपासून सावधान, पाठीत खंजीर खुपसतात, चाणक्य काय सांगतात?
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 8:55 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या प्रवृत्ती देखील असतात. काही लोक हे स्वभावाने खूप चांगले असतात. ते आपल्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करतात. मात्र काही लोक हे मुळातच धूर्त आणि कपटी असतात. असे लोक आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे असे लोक तुम्हाला वेळीच ओळखता आले पाहिजेत, जर अशा लोकांसोबत तुम्ही मैत्री केली तर भविष्यात त्याचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. असे लोक आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, तसेच हे लोक कसे ओळखायचे यासाठी देखील चाणक्य यांनी अशा लोकांची काही लक्षणं सांगितली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्या आसपास सर्वत्र आढळून येतात, यामध्ये मग कोणी तुमचे मित्र असतील, कोणी तुमचे नातेवाईक सुद्ध असू शकतात. जोपर्यंत या लोकांना तुमच्यापासून फायदा दिसतोय, तोपर्यंतच हे लोक तुमच्यासोबत असतात. जर या लोकांना वाटलं की आता तुमच्यापासून फायदा नाही, तेव्हा असे लोक पुन्हा तुमच्याकडे फिरकणार सु्द्धा नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कपटी लोक – चाणक्य म्हणतात असे लोक तर सर्वात जास्त धोकादायक असतात. या लोकांच्या मनात कायम कपटाची भावना असतो. असे लोक तुम्हाला कुठेही संकटात आणू शकतात. त्यामुळे असे लोक वेळीच ओळखावेत आणि त्यांच्यापासून लांब राहावं, त्यातच आपलं हीत आहे.

तुमच्यावर जळणारे लोक – चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात ज्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, ते लोक तुमचा मत्सर करतात. तुम्हाला मागं खेचण्यासाठी प्रयत्न करतात. अशा लोकांपासून नेहमी सावध रहावं, तसेच अशा लोकांना तुमच्या कोणत्याही गुप्त योजना सांगू नयेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना