AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार लोकांपासून सावधान, पाठीत खंजीर खुपसतात, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य म्हणतात समजात सर्व लोक सारखीच नसतात, काही लोक ही अतिशय चांगल्या स्वभावाची असतात, तर काही लोक हे धूर्त आणि कपटी असतात अशा लोकांपासून आपल्याला आपला बचाव करता आला पाहिजे.

Chanakya Niti : या चार लोकांपासून सावधान, पाठीत खंजीर खुपसतात, चाणक्य काय सांगतात?
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 8:55 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या प्रवृत्ती देखील असतात. काही लोक हे स्वभावाने खूप चांगले असतात. ते आपल्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करतात. मात्र काही लोक हे मुळातच धूर्त आणि कपटी असतात. असे लोक आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे असे लोक तुम्हाला वेळीच ओळखता आले पाहिजेत, जर अशा लोकांसोबत तुम्ही मैत्री केली तर भविष्यात त्याचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. असे लोक आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, तसेच हे लोक कसे ओळखायचे यासाठी देखील चाणक्य यांनी अशा लोकांची काही लक्षणं सांगितली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्या आसपास सर्वत्र आढळून येतात, यामध्ये मग कोणी तुमचे मित्र असतील, कोणी तुमचे नातेवाईक सुद्ध असू शकतात. जोपर्यंत या लोकांना तुमच्यापासून फायदा दिसतोय, तोपर्यंतच हे लोक तुमच्यासोबत असतात. जर या लोकांना वाटलं की आता तुमच्यापासून फायदा नाही, तेव्हा असे लोक पुन्हा तुमच्याकडे फिरकणार सु्द्धा नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कपटी लोक – चाणक्य म्हणतात असे लोक तर सर्वात जास्त धोकादायक असतात. या लोकांच्या मनात कायम कपटाची भावना असतो. असे लोक तुम्हाला कुठेही संकटात आणू शकतात. त्यामुळे असे लोक वेळीच ओळखावेत आणि त्यांच्यापासून लांब राहावं, त्यातच आपलं हीत आहे.

तुमच्यावर जळणारे लोक – चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात ज्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, ते लोक तुमचा मत्सर करतात. तुम्हाला मागं खेचण्यासाठी प्रयत्न करतात. अशा लोकांपासून नेहमी सावध रहावं, तसेच अशा लोकांना तुमच्या कोणत्याही गुप्त योजना सांगू नयेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत