AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात ‘या’ चार गोष्टी करा; आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये व्यक्तीने आपल्या आयुष्यात पैशांचा वापर कसा केला पाहिजे? याबाबत आर्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केलं आहे.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात 'या' चार गोष्टी करा; आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 31, 2025 | 9:42 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे, चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा काही नीती सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात, तसेच चाणक्य यांचे विचारही प्रेरणादायी आहेत. आर्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते, व्यक्तीला आयुष्यात आर्थिक संकट का येतात? त्यातून कसा मार्ग काढायचा याबाबत देखील चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माहिती दिली आहे.

आर्य चाणक्य म्हणतात पैसा ही अशी गोष्ट आहे, ती जर तुमच्याकडे असेल तर तुमचं आयुष्य सुखा समाधानानं आणि आनंदात जाऊ शकतं. तुम्ही तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करू शकतात. तुमच्यावर जेव्हा संकट येत त्यावेळी पैसाच तुमच्या उपयोगी येतो, त्यामुळे कठीण परिस्थितीसाठी पैशांची बचत केली पाहिजे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलंय?

मेहनत – आर्य चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही तुमच्या तरुण वयात जेवढी जास्त मेहनत कराल तेवढं म्हतारपणात तुमचं आयुष्य सुखात जाईल. कारण तेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीमधून कष्ट करून मिळवलेले चार पैसे तुमच्या गाठीशी असतील. म्हतारपणात तुम्हाला कष्ट करण्याची गरज भासणार नाही.

बचत – आर्य चाणक्य म्हणतात अनेकांना पैशांची उधळपट्टी करण्याची सवय असते, अनेक जण अनावश्यक खर्च करतात. ज्या वस्तुंची आपल्याला अवश्यकता नाही, मात्र हातात पैसा आहे, अशा स्थितीमध्ये आपण अशा अनेक गोष्टी खरेदी करतो. कालातंराने या सर्व वस्तु नष्ट होतात. आणि आपला पैसा देखील खर्च होतो. त्यामुळे पैशाची बचत केली पाहिजे.

अनावश्यक खर्च टाळा – आर्य चाणक्य म्हणतात अनेकजण नको त्या गोष्टींवर पैशांची उधळपट्टी करतात. यामुळे तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसा व्यर्थ घालतात हे टाळलं पाहिजे.

गुंतवणूक – आर्य चाणक्य म्हणतात पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करता आली पाहिजे, हाच पैसा तुम्हाला तुमच्या भविष्यात कामी येणार आहे.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.