AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात ‘या’ चार गोष्टी करा; आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये व्यक्तीने आपल्या आयुष्यात पैशांचा वापर कसा केला पाहिजे? याबाबत आर्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केलं आहे.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात 'या' चार गोष्टी करा; आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 31, 2025 | 9:42 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे, चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा काही नीती सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात, तसेच चाणक्य यांचे विचारही प्रेरणादायी आहेत. आर्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते, व्यक्तीला आयुष्यात आर्थिक संकट का येतात? त्यातून कसा मार्ग काढायचा याबाबत देखील चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माहिती दिली आहे.

आर्य चाणक्य म्हणतात पैसा ही अशी गोष्ट आहे, ती जर तुमच्याकडे असेल तर तुमचं आयुष्य सुखा समाधानानं आणि आनंदात जाऊ शकतं. तुम्ही तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करू शकतात. तुमच्यावर जेव्हा संकट येत त्यावेळी पैसाच तुमच्या उपयोगी येतो, त्यामुळे कठीण परिस्थितीसाठी पैशांची बचत केली पाहिजे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलंय?

मेहनत – आर्य चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही तुमच्या तरुण वयात जेवढी जास्त मेहनत कराल तेवढं म्हतारपणात तुमचं आयुष्य सुखात जाईल. कारण तेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीमधून कष्ट करून मिळवलेले चार पैसे तुमच्या गाठीशी असतील. म्हतारपणात तुम्हाला कष्ट करण्याची गरज भासणार नाही.

बचत – आर्य चाणक्य म्हणतात अनेकांना पैशांची उधळपट्टी करण्याची सवय असते, अनेक जण अनावश्यक खर्च करतात. ज्या वस्तुंची आपल्याला अवश्यकता नाही, मात्र हातात पैसा आहे, अशा स्थितीमध्ये आपण अशा अनेक गोष्टी खरेदी करतो. कालातंराने या सर्व वस्तु नष्ट होतात. आणि आपला पैसा देखील खर्च होतो. त्यामुळे पैशाची बचत केली पाहिजे.

अनावश्यक खर्च टाळा – आर्य चाणक्य म्हणतात अनेकजण नको त्या गोष्टींवर पैशांची उधळपट्टी करतात. यामुळे तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसा व्यर्थ घालतात हे टाळलं पाहिजे.

गुंतवणूक – आर्य चाणक्य म्हणतात पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करता आली पाहिजे, हाच पैसा तुम्हाला तुमच्या भविष्यात कामी येणार आहे.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.