AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात सापापेक्षाही धोकादायक असतात असे लोकं, चुकूनही विश्वास ठेवू नका, धोकाच मिळणार

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी स्वभावाची काही वैशिष्ट सांगितली आहेत.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात सापापेक्षाही धोकादायक असतात असे लोकं, चुकूनही विश्वास ठेवू नका, धोकाच मिळणार
| Updated on: Apr 14, 2025 | 9:57 PM
Share

आर्य चाणक्य हे एक थोर विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक विषयांवर चर्चा केली, जे विषय आज देखील जीवन जगताना अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आदर्श पती कसा असावा, आदर्श पतीची लक्षण काय आहेत? आदर्श पत्नी कशी असावी, आदर्श पत्नीची लक्ष काय आहेत? राजाचे आपल्या प्रजेसोबत संबंध कसे असावेत? प्रजेनं राजासोबत कसं वागावं? आदर्श राज्यकारभार कसा असावा. जीवनात कोणत्या गोष्टी करू नयेत? कोणत्या गोष्टी कराव्यात. शत्रू कसा ओळखावा? आपला खरा मित्र कोण? अशा एकना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे.

ते आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात की काही लोक असे असतात, की ते सापांपेक्षा देखील जास्त घातक असतात. ते आपल्याला केव्हा दंश करतील हे सांगता पण येत नाही. त्यामुळे अशा लोकांवर चूकनही विश्वास ठेवू नका. ती तुमची तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असू शकते. अशा लोकांपासून चार हात दूरच राहिलेलं चांगलं असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे.

या लोकांवर विश्वास ठेवू नका

आर्य चाणक्य म्हणतात की असे लोक जे तुमच्या तोंडावर तुमचं कौतुक करतात. मात्र तुमच्या पाठिमागे तुमची निंदा करतात, अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तुमची पत्नी जर तुम्हाला धोका देत असेल तर तिच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका असंही आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. तुमचा खूप जवळचा मित्र असेल, तुमचा त्याच्यावर खूप विश्वास आहे, मात्र त्याने जर तुमचा विश्वासघात केला तर अशा मित्रावर तुम्ही परत कधीच विश्वास ठेवू नका, कारण तुम्हाला पुन्हा देखील धोकाच भेटू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींपासून तुम्ही स्वत:ला दूर ठेवा त्यातच तुमचं भलं आहे, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....