AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात सापापेक्षाही धोकादायक असतात असे लोकं, चुकूनही विश्वास ठेवू नका, धोकाच मिळणार

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी स्वभावाची काही वैशिष्ट सांगितली आहेत.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात सापापेक्षाही धोकादायक असतात असे लोकं, चुकूनही विश्वास ठेवू नका, धोकाच मिळणार
| Updated on: Apr 14, 2025 | 9:57 PM
Share

आर्य चाणक्य हे एक थोर विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक विषयांवर चर्चा केली, जे विषय आज देखील जीवन जगताना अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आदर्श पती कसा असावा, आदर्श पतीची लक्षण काय आहेत? आदर्श पत्नी कशी असावी, आदर्श पत्नीची लक्ष काय आहेत? राजाचे आपल्या प्रजेसोबत संबंध कसे असावेत? प्रजेनं राजासोबत कसं वागावं? आदर्श राज्यकारभार कसा असावा. जीवनात कोणत्या गोष्टी करू नयेत? कोणत्या गोष्टी कराव्यात. शत्रू कसा ओळखावा? आपला खरा मित्र कोण? अशा एकना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे.

ते आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात की काही लोक असे असतात, की ते सापांपेक्षा देखील जास्त घातक असतात. ते आपल्याला केव्हा दंश करतील हे सांगता पण येत नाही. त्यामुळे अशा लोकांवर चूकनही विश्वास ठेवू नका. ती तुमची तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असू शकते. अशा लोकांपासून चार हात दूरच राहिलेलं चांगलं असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे.

या लोकांवर विश्वास ठेवू नका

आर्य चाणक्य म्हणतात की असे लोक जे तुमच्या तोंडावर तुमचं कौतुक करतात. मात्र तुमच्या पाठिमागे तुमची निंदा करतात, अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तुमची पत्नी जर तुम्हाला धोका देत असेल तर तिच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका असंही आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. तुमचा खूप जवळचा मित्र असेल, तुमचा त्याच्यावर खूप विश्वास आहे, मात्र त्याने जर तुमचा विश्वासघात केला तर अशा मित्रावर तुम्ही परत कधीच विश्वास ठेवू नका, कारण तुम्हाला पुन्हा देखील धोकाच भेटू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींपासून तुम्ही स्वत:ला दूर ठेवा त्यातच तुमचं भलं आहे, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...