AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे गुण असलेली मुलं मोठेपणी करतात जगाचं नेतृत्व, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, मुलं मोठं होऊन काय करणार? हे त्याच्या लहाणपणीच जवळपास निश्चत झालेलं असतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : हे गुण असलेली मुलं मोठेपणी करतात जगाचं नेतृत्व, चाणक्य काय म्हणतात?
CHANAKYA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 15, 2026 | 7:22 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शन करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात मुलं ही चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात. जसा कुंभार एखाद्या चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन त्याच्यापासून सुंदर अशी मातीची भांडी बनवतो, त्याचप्रमाणे प्रत्येक आई-वडीलांची देखील जबाबदारी असते की, आपल्या मुलांवर योग्य संस्कार त्यांनी केले पाहिजेत, तसेच त्याला योग्य आणि चांगलं शिक्षण देखील दिलं पाहिजे. ज्यामुळे मुलांचा पाया मजबूत होतो आणि भविष्यातील आवाहनाचा सामना करण्यासाठी ते सक्षम होतात. चाणक्य पुढे असंही म्हणतात की जरी मुलांना घडवण्याची जबाबदारी आई-वडिलांची असली तरी देखील मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. काही मुलांमध्ये उपजतच असे काही गुण असतात, त्याच्या बळावर ते जगावर राज्य करतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

प्रश्र विचारणारे मुलं – चाणक्य म्हणतात ज्या मुलांना त्याच्या विद्यार्थी दशेत विविध प्रश्न पडतात, जे सारखे आपल्या शिक्षकांना किंवा आई-वडिलांना प्रश्न विचारतात. जो पर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळून त्यांचं समाधान होत नाही, तोपर्यंत ते स्वस्त बसत नाही. अशी मुलं भविष्यात जगाचं नेतृत्व करतात. अशी मुलं समाजाचे प्रश्न उत्तमरित्या मांडू शकतात. जग देखील अशा मुलाचं नेतृत्व स्विकारतं.

दुसऱ्यांना मदत करणारी मुलं – चाणक्य म्हणतात तुमचं मुल मोठेपणी नक्की काय करणार आहे, याचा अंदाज मुलाच्या लहानपणीच येतो. जर तुमच्या मुलांना नेहमी दुसऱ्यांना मदत करायला आवडत असेल, तर समजून जा तुमचा मुलगा भविष्यात समाजाचं नेतृत्व करू शकतो. अशी लोकं स्वत: पुढाकार घेऊन जगाचं नेतृत्व स्वीकारतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कधीही पराभव मान्य न करणे – चाणक्य म्हणतात तुमचं मुल जर पराभवाला घाबरत नसेल, एखाद्यावेळी जर त्याचा पराभव झाला तर तो त्यातून योग्य धडा घेऊन पुढच्यावेळी अधिक परिश्रम करत असेल, आपल्या कार्यातून इतरांना प्रेरणा देत असेल तर समजून जा तुमचं मुलं नक्कीच मोठेपणी गावाचं, शहराचं, राज्याचं किंवा देशाचं देखील नेतृत्व करू शकतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी