AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या लोकांना कधीच उसणे पैसे देऊ नका, बुडालेच म्हणून समजा

आर्य चाणक्य हे एक विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी माणसाने आपल्या हातात असलेल्या पैशांचा उपयोग कसा करावा? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. काही लोक असे असतात त्यांना उसणे पैसे दिल्यानंतर ते तुम्हाला परत कधीही मिळत नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Chanakya Niti : या लोकांना कधीच उसणे पैसे देऊ नका, बुडालेच म्हणून समजा
chanakya niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 10:45 AM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने पैशांचा वापर कसा करावा? पैसे कुठे खर्च करावेत? आणि कुठे खर्च करू नये? पैशांची बचत कशी करावी? गुंतवणूक कुठे करावी? थोडक्यात मानसाने पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात असे काही लोक असतात त्यांना जर तुम्ही उसणे पैसे दिले तर ते पैसे तुम्हाला परत तुमच्या गरजेच्या वेळी मिळतीलच याची कोणतीही खात्री नसते, त्यामुळे अशा लोकांना पैसे देताना हजार वेळा विचार करा, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

फसवणूक करणारे लोक – चाणक्य म्हणतात समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. काही लोक हे अतिशय प्रामाणिक असतात, मात्र समाजात असे  देखील काही लोक असतात, जे तुमची फसवणूक करू शकतात, असे लोक तुम्हाला ओळखता आले पाहिजे, जर तुम्ही अशा लोकांना पैसे दिले तर हे लोक तुमची फसवणूक करतील, तुम्हाला तुमचे पैसे कधीही परत मिळणार नाहीत, त्यामुळे संकटाच्या काळात तुम्ही अडचणीत याला त्यामुळे अशा लोकांना कधीही पैसे उसणे देऊ नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

मूर्ख लोक – चाणक्य म्हणतात जे लोक मूर्ख असतात त्यांना पैशांचा वापर कसा करायचा? याबद्दल माहिती नसते, त्यामुळे जर अशा एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे उसणे घेतले तर तो त्या पैशांची उधळपट्टीच करणार आहे, तो तुमचे पैसे खर्च करून टाकेल, त्यानंतर तो तुम्हाला तुमचे पैसे परत कधीही देणार नाही, त्यामुळे अशा लोकांना पैसे देऊ नये.

लालची लोक – चाणक्य म्हणतात या लोकांच्या हातून पैसा कधीच सुटत नाही. भलेही तुम्ही त्या व्यक्तीला उसणे पैसे दिले असतील, परंतु तो तुमचेच पैसे तुम्हाला परत करण्यासाठी टाळाटाळ करेल, त्यामुळे अशा लोकांना कधीही उसणे पैसे देऊ नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत