AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात.

Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 8:39 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील एखाद्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. माणसानं आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात काही गोष्टी या अशा असतात, ज्या फक्त भाग्यवान माणसांच्याच वाट्याला येतात. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, तुम्ही त्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी देखील तुम्ही त्या गोष्टी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे माणसाने नेहमी आपलं कर्म चांगलं ठेवावं, ज्याचं कर्म चांगलं आहे, त्याच्या वाट्याला कधीही दु:ख येत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

सद्गुणी संतती – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तींचं कर्म चांगलं असतं, त्यांच्या पोटी सद्गुणी संतती जन्माला येते. अशा व्यक्तींच्या पोटी जन्माला आलेलं मुलं संपूर्ण कुळाचा उद्धार करतं. म्हतारापणात आपल्या आई-वडिलांचा आधार बनतं. मात्र असं मुलं केवळ फक्त भाग्यवान माणसाच्या पोटीच जन्माला येऊ शकतं. तुम्ही कितीही श्रीमंत असाल आणि जर तुमचे कर्म चांगले नसतील तर तुमच्या पोटी अशी संतती कधीच जन्म घेऊ शकत नाही. त्यासाठी माणसाने नेहमी आपले कर्म हे चांगले ठेवले पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

आई- वडिलांचं प्रेम – चाणक्य म्हणतात या जगात तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकतात. परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही आई-वडिलांचं प्रेम विकत घेऊ शकत नाहीत. जे लोक खरोखर भाग्यवान असतात, त्यांच्या वाट्याला दीर्घकाळ आई-वडिलांचं प्रेम येतं. त्यामुळे माणसाने आई-वडिलांची सेवा करून आपलं आयुष्य सार्थकी लावावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मान, सन्मान – चाणक्य म्हणतात तुम्ही कितीही श्रीमंत असाल एकवेळी लोक तुमचा तुमच्या तोंडावर भलेही आदर करतील. परंतु तुमच्या पाठीमागे कायम तुमची निंदाच करतात. परंतु या जगात फार थोडे लोक असे असतात, ज्यांना त्यांच्यासमोरही सन्मान मिळतो आणि त्यांच्या पाठीमागे देखील लोक त्यांनी निंदा न करता त्यांचं कौतुकच करतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?