AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात.

Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 8:39 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील एखाद्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. माणसानं आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात काही गोष्टी या अशा असतात, ज्या फक्त भाग्यवान माणसांच्याच वाट्याला येतात. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, तुम्ही त्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी देखील तुम्ही त्या गोष्टी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे माणसाने नेहमी आपलं कर्म चांगलं ठेवावं, ज्याचं कर्म चांगलं आहे, त्याच्या वाट्याला कधीही दु:ख येत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

सद्गुणी संतती – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तींचं कर्म चांगलं असतं, त्यांच्या पोटी सद्गुणी संतती जन्माला येते. अशा व्यक्तींच्या पोटी जन्माला आलेलं मुलं संपूर्ण कुळाचा उद्धार करतं. म्हतारापणात आपल्या आई-वडिलांचा आधार बनतं. मात्र असं मुलं केवळ फक्त भाग्यवान माणसाच्या पोटीच जन्माला येऊ शकतं. तुम्ही कितीही श्रीमंत असाल आणि जर तुमचे कर्म चांगले नसतील तर तुमच्या पोटी अशी संतती कधीच जन्म घेऊ शकत नाही. त्यासाठी माणसाने नेहमी आपले कर्म हे चांगले ठेवले पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

आई- वडिलांचं प्रेम – चाणक्य म्हणतात या जगात तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकतात. परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही आई-वडिलांचं प्रेम विकत घेऊ शकत नाहीत. जे लोक खरोखर भाग्यवान असतात, त्यांच्या वाट्याला दीर्घकाळ आई-वडिलांचं प्रेम येतं. त्यामुळे माणसाने आई-वडिलांची सेवा करून आपलं आयुष्य सार्थकी लावावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मान, सन्मान – चाणक्य म्हणतात तुम्ही कितीही श्रीमंत असाल एकवेळी लोक तुमचा तुमच्या तोंडावर भलेही आदर करतील. परंतु तुमच्या पाठीमागे कायम तुमची निंदाच करतात. परंतु या जगात फार थोडे लोक असे असतात, ज्यांना त्यांच्यासमोरही सन्मान मिळतो आणि त्यांच्या पाठीमागे देखील लोक त्यांनी निंदा न करता त्यांचं कौतुकच करतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?