AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | सरळ सोप आयुष्य जगायचंय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी आत्मसात करा

आचार्य चाणक्य यांनी जीवनात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने मनुष्य आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करू शकतो. तो आपले आयुष्य साध्य सोप्या मार्गाने जगू शकतो. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या काळात सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आजच्या काळातही लागू होतात.

Chanakya Niti | सरळ सोप आयुष्य जगायचंय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी आत्मसात करा
chanakya-niti
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 9:53 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या मते माणसाची इच्छा असेल तर तो आपल्या आचरणाने जीवनातील सर्व संकटे टाळू शकतो आणि त्याचे दुःख बऱ्याच अंशी कमी करू शकतो. आचार्य यांनी आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या समजून घेतल्यास माणूस सर्व संकटांपासून स्वतःला वाचवू शकतो. अशा लोकांसोबत दुःख सहजासहजी फिरकत नाही.

1. आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, माणसाच्या आचरणाने त्याच्या कुटुंबाची कीर्ती बनते, माने जीवनात मान-सन्मान वाढतो आणि अन्नाने शरीराची शक्ती वाढते. या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

2. आचार्य चाणक्य म्हणतात की दान आणि तपश्चर्याने मिळणारे पुण्य तात्काळ मिळते, परंतु जर तुमचे दान एखाद्या योग्य व्यक्तीकडे गेले तर त्याचा इतरांनाही फायदा होतो. असा पुण्य दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतो. म्हणून नेहमी योग्यांना दान द्या.

3. आचार्य चाणक्यच्या मते जो वासनेच्या अधीन असतो, अहंकारी असतो आणि पैशाच्या मागे धावतो, तो माणूस स्वतःला आंधळा बनवतो. अशा लोकांना कोणत्याही कृतीत पाप दिसत नाही. या व्यक्तीना स्वत:पासून लांब ठेवा

4.आचार्य चाणक्यच्या मते एखादा लोभी माणूस भेटवस्तू देऊन सहजपणे संतुष्ट होऊ शकतो. कठोर माणूस हात जोडून समाधानी होऊ शकतो, मूर्खाला आदर देऊन समाधानी होऊ शकतो आणि विद्वान सत्य बोलून समाधानी होऊ शकतो.

5. आचार्यांचा असा विश्वास होता की हाताचे सौंदर्य दागिन्यांमुळे नाही तर दानाने होते. स्वच्छता चंदनाची पेस्ट लावल्याने होत नाही, तर पाण्यात आंघोळ केल्याने येते. माणूस अन्न खाऊन नाही तर सन्मान देऊन तृप्त होतो.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)

इतर बातम्या :

कोणतीच कामं वेळेत होत नाहीत? शनिवारी 5 कामे करुन बघा चुटकीसरशी होतील सर्व कामं

Dev Uthani Ekadashi 2021 | देवउठनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही खाऊ नये, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल

Spiritual Trees | हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जातात ही झाडं, जाणून घ्या कोणत्या झाडाचं काय महत्त्व?

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.