AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार चुकांमुळे आयुष्यात होतं फार मोठं नुकसान, चाणक्यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष नको

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की आपण आपल्या आयुष्यात काही चुका अशा करतो की, त्यानंतर त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या चार चुकांमुळे आयुष्यात होतं फार मोठं नुकसान, चाणक्यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष नको
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 7:35 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं? आपलं आयुष्य कसं जगावं? याबाबत चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांचे हे विचार आजही अनेकांना जगण्याचं बळ देतात. चाणक्य म्हणतात आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींचं महत्त्व कळत असूनही त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. तर काही गोष्टींकडे आपलं नकळत दुर्लक्ष होतं. मात्र या गोष्टी आपल्या आयुष्यात एवढ्या महत्त्वाच्या असतात की आपलं त्यामुळे भविष्यात सर्वात मोठं नुकसान होतं. एकदा वेळ निघून गेली की त्या गोष्टी आपण परत मिळू सुद्धा शकत नाहीत, त्यामुळे आपल्यावर पश्चातापाची वेळ येते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संगत – चाणक्य म्हणतात संगत ही सर्वात महत्त्वाची असते, तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात, त्यावर तुमचं भविष्य कसं असणार हे ठरतं. तुम्ही जर चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये असाल तर नक्कीच तुमचं भविष्य हे चांगलं असेल. परंतु तुम्ही जर वाईट लोकांच्या संगतीमध्ये असाल तर मात्र तुम्ही आयुष्यात कधीही प्रगती करू शकणार नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिक्षण – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जर काही महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे शिक्षण जर तुम्ही सुशिक्षित असाल तर तुम्ही नक्कीच प्रगती कराल. परंतु जर तुम्ही शिक्षण घेण्याच्या वयामध्ये शिक्षण घेतलं नाही, शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येते. शिक्षण नसेल तर तुम्हाला चांगला रोजगार मिळू शकत नाही, त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

वेळ – चाणक्य म्हणतात या जगात जर सर्वात जास्त काही मौल्यवान असेल तर ती म्हणजे वेळ, ज्या व्यक्तींना वेळेचं महत्त्व माहीत असतं, त्या लोकांचा या जगात कधीही पराभव होऊ शकत नाही. त्यामुळे वेळेकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाला पर्याय नाही, त्यामुळे माणसाने कधीही आळस करू नये. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्त यश तुम्हाला मिळेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन