AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार चुकांमुळे आयुष्यात होतं फार मोठं नुकसान, चाणक्यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष नको

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की आपण आपल्या आयुष्यात काही चुका अशा करतो की, त्यानंतर त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या चार चुकांमुळे आयुष्यात होतं फार मोठं नुकसान, चाणक्यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष नको
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 7:35 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं? आपलं आयुष्य कसं जगावं? याबाबत चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांचे हे विचार आजही अनेकांना जगण्याचं बळ देतात. चाणक्य म्हणतात आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींचं महत्त्व कळत असूनही त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. तर काही गोष्टींकडे आपलं नकळत दुर्लक्ष होतं. मात्र या गोष्टी आपल्या आयुष्यात एवढ्या महत्त्वाच्या असतात की आपलं त्यामुळे भविष्यात सर्वात मोठं नुकसान होतं. एकदा वेळ निघून गेली की त्या गोष्टी आपण परत मिळू सुद्धा शकत नाहीत, त्यामुळे आपल्यावर पश्चातापाची वेळ येते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संगत – चाणक्य म्हणतात संगत ही सर्वात महत्त्वाची असते, तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात, त्यावर तुमचं भविष्य कसं असणार हे ठरतं. तुम्ही जर चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये असाल तर नक्कीच तुमचं भविष्य हे चांगलं असेल. परंतु तुम्ही जर वाईट लोकांच्या संगतीमध्ये असाल तर मात्र तुम्ही आयुष्यात कधीही प्रगती करू शकणार नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिक्षण – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जर काही महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे शिक्षण जर तुम्ही सुशिक्षित असाल तर तुम्ही नक्कीच प्रगती कराल. परंतु जर तुम्ही शिक्षण घेण्याच्या वयामध्ये शिक्षण घेतलं नाही, शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येते. शिक्षण नसेल तर तुम्हाला चांगला रोजगार मिळू शकत नाही, त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

वेळ – चाणक्य म्हणतात या जगात जर सर्वात जास्त काही मौल्यवान असेल तर ती म्हणजे वेळ, ज्या व्यक्तींना वेळेचं महत्त्व माहीत असतं, त्या लोकांचा या जगात कधीही पराभव होऊ शकत नाही. त्यामुळे वेळेकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाला पर्याय नाही, त्यामुळे माणसाने कधीही आळस करू नये. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं जास्त यश तुम्हाला मिळेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्.....
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्......
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली..
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली...
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती.
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल.
मनोज जरांगेंनंतर ओबीसी समाजाचं वादळ येणार, नेमकी भानगड काय?
मनोज जरांगेंनंतर ओबीसी समाजाचं वादळ येणार, नेमकी भानगड काय?.
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा
...तर उद्रेक होऊ शकतो, शाहू महाराजांनी दिला थेट इशारा, मराठा आंदोलनाबा.