AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ज्यांच्यामध्ये असतात हे सात गुण, असेच पुरुष महिलांना जास्त आवडतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये आदर्श पुरुषांची लक्षणं सांगितली आहेत.

Chanakya Niti : ज्यांच्यामध्ये असतात हे सात गुण, असेच पुरुष महिलांना जास्त आवडतात
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 28, 2025 | 11:23 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये पुरुषांचे असे सात गुण सांगितले आहेत, जे गुण त्याला आदर्श बनवतात, पुरुषांमध्ये असलेल्या या सात गुणांमुळे महिलांना त्या पुरुषाबद्दल आदर वाटतो, आज याच सात गुणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

प्रामाणिकपणा – आर्य चाणक्य म्हणतात कोणतीही महिला पुरुषामध्ये जर सगळ्यात आधी काय शोधत असेल तर तो म्हणजे प्रामाणिकपणा, कारण प्रत्येक महिला आपल्या होणाऱ्या लाईफ पार्टनकडून किंवा पतीकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करत असते.

आदर – स्त्रीयांना असे पुरुष आवडतात जे दुसऱ्याचा आदर करतात, कधीही त्यांना दुखावत नाहीत. आदर ही एक अशी गोष्ट आहे, जेवढा तुम्ही दुसऱ्याचा आदर कराल तेवढाच जगात तुमचाही आदर होईल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संयम –  आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर चढ- उतार सुरूच असतात, मात्र आयुष्यात वादळ आले असताना देखील जे पुरुष त्याचा संयमानं सामना करतात अशा कुठल्याही पुरुषांबद्दल स्त्रीला आदर वाटतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

ध्येय स्पष्ट असणारा – चाणक्य म्हणतात आयुष्य जगत असताना तुमची ध्येय-धोरणं स्पष्ट असली पाहिजेत, तरच तुम्हाला यश मिळू शकतं, ज्यांची ध्येय स्पष्ट आहेत अशा पुरुषांचा महिलांवर अधिक प्रभाव पडतो.

स्वच्छता – चाणक्य म्हणतात जो माणूस साधा पण टापटीप राहातो, ज्याचं राहाणीमान स्वच्छ आहे, असे पुरुष स्त्रीयांवर जास्त प्रभाव पाडतात.

विनोदी मात्र, मर्यादा पाळणारा – चाणक्य म्हणतात महिलांना विनोदी पुरुष आवडतात, मात्र त्यामध्ये एक निश्चित अशी मर्यादा असली पाहिजे.

भावनात्मक पातळीवर सशक्त  – आर्य चाणक्य म्हणतात  जे पुरुष भावानात्मक पातळीवर अधिक सशक्त असतात अशा पुरुषांना स्त्रीया पसंत करतात. आपला लाईफ पाटर्नर हा भावनात्मक पातळीवर सशक्त असावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.