AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंचांमृताने शिवाला अभिषेक करण्याला आहे विशेष महत्त्व, मनाच्या पाच विकारांशी आहे संबंध

दूध, दही, मध, तूप आणि साखर या पाच गोष्टी मिसळून पंचामृत बनवतात. श्रावणात शंकराला पंचामृत अभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. प्रथम शिवलिंगाला जल अर्पण करा आणि नंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्पण करा.

पंचांमृताने शिवाला अभिषेक करण्याला आहे विशेष महत्त्व, मनाच्या पाच विकारांशी आहे संबंध
पंचामृत Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 12, 2023 | 6:28 PM
Share

मुंबई : प्राचीन काळापासून माणूस पंचतत्त्वांचा समतोल राखण्यासाठी वास्तुशास्त्र, आयुर्वेद शास्त्र, अध्यात्मिक पद्धती, पूजा-पाठ, कर्मकांड यांचा आधार घेत आहे. श्रावण महिन्यात भगवान शिवाचा रुद्राभिषेक हा गृहस्थांसाठी आरोग्य आणि आनंदासोबतच ग्रहांच्या त्रासातून मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जाणून घेऊया त्याचे महत्त्व आणि खास गोष्टी. मन, वासना, क्रोध, लोभ, आसक्ती आणि अहंकार या पाच विकारांनी मनुष्याला दुःख प्राप्त होते. जेव्हा मनुष्य मनाच्या विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध अंतःकरणाने भगवंताची उपासना करतो तेव्हाच उपासना यशस्वी मानली जाते. मन शुद्ध होण्यासाठी प्रत्येक उपासनेत पंचामृताचा उपयोग सांगितला आहे. शिवलिंग व इतर देवतांच्या स्नानापासून पंचामृत (Panchamrut Abhishek) प्रसाद स्वरूपात घेण्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. यशासाठी मन निर्मळ आणि बलवान असणं गरजेचं असल्याचं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

पुजेत पंचामृताचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचा संबंध माणसाच्या मनाशी आणि पांढर्‍या गोष्टींशी आहे, पंचामृतातील दूध, दही, साखर, तुप अणि मध इत्यादी पांढर्‍या गोष्टी चंद्राचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा शिवलिंगाला चंद्रप्रधान दूध, दही इत्यादींनी स्नान केले जाते, तेव्हा व्यक्तीच्या मनातील नकारात्मक ऊर्जा शुभ उर्जेमध्ये रूपांतरित होते. म्हणूनच श्रावण महिन्यात शिवाच्या पूजेमध्ये रुद्राभिषेकाला सर्वाधिक महत्त्व आहे. मन शुद्ध झाल्यावर शिवाला त्याच्या भक्तांवर जितके प्रेम असते तितकेच भक्ताचे शिवावर असते कारण शिव अंतर्यामी आहे. जर भक्ताने त्याची खऱ्या मनाने पूजा केली तर शिव आपल्या भक्तांना नित्य आशीर्वाद देतो.

शिवपूजा म्हणजे पाच तत्वांचा समन्वय

सृष्टीची निर्मिती करताना भगवंताने मानवाचे भौतिक शरीर त्याच्या पूर्ण भागातून पाच घटकांचे मिश्रण करून निर्माण केले आहे, त्यामुळे सुख-शांतीचे जीवन जगण्यासाठी मनुष्याला पंच तत्वांचा समन्वय आवश्यक आहे. प्राचीन काळापासून ऋषी-मुनींना माहित होते की पंचतत्व आणि पंचामृत सेवन केल्याने माणसाची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते, ज्यामुळे रोगांचा संसर्ग टाळता येतो. शरीरातील कोणताही घटक कोणत्याही कारणाने कमकुवत झाला तर शरीर अस्वस्थ होते. अग्नी, पृथ्वी, वायू, पाणी, आकाश या पंचतत्त्वांतील असंतुलनामुळे नैसर्गिक आपत्ती उद्भवतात, मानवी शरीरात असलेल्या पंचभूत घटकांच्या असंतुलनामुळे रोग निर्माण होतात आणि मनाच्या पाच विकारांमुळे मनुष्याला त्रास होतो. श्रावण महिन्यात जेव्हा लोकं निसर्गातून निर्माण झालेल्या वस्तू अर्पण करून शिवाची आराधना करतात, तेव्हा पाच घटक आणि वातावरण यांच्या समतोलाने प्रत्येकाला उपयुक्त ऊर्जा प्राप्त होते, जी जगाच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे.

शिवाची पंचामृत उपासना फलदायी आहे

दूध, दही, मध, तूप आणि साखर या पाच गोष्टी मिसळून पंचामृत बनवतात. श्रावणात शंकराला पंचामृत अभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. प्रथम शिवलिंगाला जल अर्पण करा आणि नंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्पण करा. प्रत्येक वस्तू अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला पाण्याने स्नान घालावे. पूजेदरम्यान पंचाक्षर किंवा षडाक्षर मंत्राचा पाठ करत राहा. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात भगवान शंकराला पंचामृताने अभिषेक केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जसे की, धनासाठी पंचामृत स्नान, संततीसाठी गाईच्या दुधाचा अभिषेक, घर, वाहन, संपत्तीसाठी दही. धनप्राप्तीसाठी, दु:खांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मधाचा अभिषेक करावा, रोग बरे करण्यासाठी, कल्याण आणि मोक्षासाठी, बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी साखर मिसळलेल्या पाण्याचा अभिषेक करावा. शिवाला पंचामृताने स्नान केल्याने लोभ, आसक्ती, अहंकार इत्यादी पाच दुर्गुणांचा नाश होतो, मनुष्याचे मन कोमल होते आणि मनोकामना पूर्ण होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना