AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj : मागच्या जन्माचं फळ या जन्मात का मिळतं? जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?

प्रेमानंद महाराज एक प्रसिद्ध संत आहेत, त्यांची प्रवचन ऐकण्यासाठी त्यांचे भक्त कायमच गर्दी करत असतात, भक्तांना जे प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेमानंद महाराज आपल्या प्रवचनांमध्ये देऊन भक्तांचं समाधान करतात. मागच्या जन्माचं फळ आपल्याला या जन्मात कसं मिळतं ? याबद्दल प्रेमानंद महाराज यांनी आपल्या एका प्रवचनामध्ये सांगितलं आहे.

Premanand Maharaj : मागच्या जन्माचं फळ या जन्मात का मिळतं? जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
प्रेमानंद महाराज Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 7:12 PM
Share

आपण अनेकदा कोणाला तरी असं म्हणलेलं ऐकत असतो की जाऊ दे, ते माझ्या मागच्या जन्मीचं पाप असणार त्यामुळे आज हे माझ्या वाट्याला आलं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते, तेव्हा काही जण असं देखील म्हणतात की त्याने नक्कीच आपल्या मागच्या जन्मी पुण्य केलं असेल म्हणून त्याला आज ही गोष्ट मिळाली. मग खरच आपल्याला आपण मागच्या जन्मामध्ये जे कर्म करतो त्याचं फळ या जन्मात मिळत का? जाणून घेऊयात याबाबत प्रेमानंद महाराज नेमकं काय म्हणतात? प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन सुरू असताना एका महिलेनं त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला होता. की मागच्या जन्मात आपण जी कर्म केली त्याचं फळ आपल्याला या जन्मात का मिळतं?

नेमकं काय म्हणाले प्रेमानंद महाराज?

यावर बोलताना प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की, जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीची हत्या केली तर तुम्हाला लगेचच फाशी दिली जाती का? तर नाही. त्यासाठी आधी 10 -15 वर्ष न्यायालयात खटला चालतो, त्यानंतर ठरवलं जातं कोणती शिक्ष द्यायची. त्याचप्रमाणे आपल्या ब्रम्हांडामध्ये देवाचं मोठं न्यायालय आहे. मात्र जेव्हा या न्यायालयात तुमचा खटला दाखल होतो, तेव्हा तिथे तुम्ही 100 जन्म जुन्या पापांची शिक्षा देखील मिळते, तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात जी कर्म केली आहेत, त्यानुसार तुम्हाला तुमच्या पुढच्या जन्मात त्याचं फळ मिळतं.

सतत चांगले कर्म करत रहा

त्यामुळे मानसाने नेहमी आपले कर्म चांगले ठेवावेत असं देखील प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. जो वाईट कर्म करतो त्याला त्याची शिक्षा पुढच्या जन्मामध्ये नक्की मिळते, तर जो या जन्मात चांगले कर्म करतो, त्याला त्याचं चांगलं फळ पुढच्या जन्मात मिळतं, त्यामुळे माणसाने नेहमी आपली कर्म चांगली ठेवावीत, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.