AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चातुर्मासात ‘या’ वास्तु नियमांचे करा पालन, घरातील नकारात्मकता होईल दूर

चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत असतात आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. या काळात घरात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक प्रभावी उपाय आहेत ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

चातुर्मासात 'या' वास्तु नियमांचे करा पालन, घरातील नकारात्मकता होईल दूर
चातुर्मासात 'या' वास्तु नियमांचे करा पालन, घरातील नकारात्मकता होईल दूरImage Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Jul 19, 2026 | 8:23 PM
Share

हिंदू धर्मात चातुर्मासाचा काळ खूप विशेष मानला जातो. चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी असतो. या चार महिन्यात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जातात. त्यानंतर या चार महिन्यांच्या काळात भगवान शिव विश्वाचे शासन करतात. चातुर्मास हा पूजा, प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी विशेष काळ मानला जातो. या चार महिन्यांमध्ये देवता निद्रा घेतात, त्यामुळे विवाहासह सर्व शुभ कार्ये या काळात थांबवली जातात, कारण या काळात शुभ कार्यांना शुभ फळ मिळत नाही. चातुर्मास दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीला सुरू होतो.

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवूठनी एकादशीला चातुर्मास संपतो. या वर्षी चातुर्मास 25 जुलै रोजी सुरू होईल आणि 20 नोव्हेंबर रोजी संपेल. असे मानले जाते की चातुर्मास दरम्यान घरात नकारात्मक ऊर्जेचा मोठा प्रभाव असतो. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो. वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अनेक विशिष्ट उपाय सांगितले आहेत. या उपायांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-समाधान वाढते. चला तर मग, चातुर्मास दरम्यान घर नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त ठेवण्यासाठी कोणते उपाय करावे ते जाणून घेऊयात.

चातुर्मासात घरात नकारात्मकता दूर ठेवण्याचे उपाय

मिठाने फरशी पुसणे: चातुर्मासात रोज पाण्यात मिठ मिक्स करून संपूर्ण घराची फरशी पुसावे. हा विधी नियमितपणे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास आणि घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते.

कापूर जाळणे: हिंदू धर्मात धार्मिक विधींमध्ये कापूर जाळण्याला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीही ते फायदेशीर मानले जाते. जर तुमच्या घरात कौटुंबिक कलह असेल, तर चातुर्मासात दररोज कापूर जाळा. असे मानले जाते की या प्रथेमुळे वातावरण शुद्ध होते आणि कौटुंबिक कलह कमी होण्यास मदत होते.

दिवा लावा: जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तर चातुर्मासात दररोज मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे घरात स्वागत होते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखली जाते. यामुळे आर्थिक लाभाची शक्यताही निर्माण होते.

पाणी शिंपडणे: चातुर्मासात दररोज आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडा. या प्रथेमुळे तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...