AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरुन ऑफिसचं काम करताय? ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष

कोरोना महामारीनंतर अनेक जर घरून काम करततात, पण घरून काम करणाऱ्या काही गोश्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे... काही गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका...

घरुन ऑफिसचं काम करताय? 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष
| Updated on: Apr 29, 2026 | 1:56 PM
Share

कोरोना महामारीच्या काळात एकमेकांसोबत अधिक संपर्क यायला नको म्हणून अनेकांनी वर्क फ्रॉम होम करण्यास सुरुवात केली. पण घरुन काम करण्याऱ्यासाठी देखील काही नियम वास्तूशास्त्रात दिले आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे. विशेषतः घराला. प्रत्येकाच्या आयष्यात घर हा एक हळवा विषय आहे. कारण अनेक भावना घराची जोडलेल्या असतात. आपण दिवसाची सुरुवात घरातच करतो आणि दिवसभराचा सर्व थकवा घरीच घालवतो. म्हणूनच घर बांधताना आपण वास्तूला इतके महत्त्व देतो. घर बांधल्यानंतरही, आपण तिथे कोणती वस्तू ठेवतो, प्रत्येक गोष्ट कुठे करतो आणि तिची दिशा काय असावी, या सर्वांना खूप महत्त्व असते. अशात, काही लोक घरूनच काम करतात.

घरून काम करणाऱ्या लोकांना थकवा जाणवणे आणि मानसिक संघर्ष होणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत, वास्तूशास्त्रानुसार घरात काही बदल केल्यास समाधान मिळू शकेल. वास्तूच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. विद्यार्थी असोत वा कर्मचारी वातावरण चांगले असेल तरच एकाग्रतेने काम करणे शक्य होते. शिवाय, कुटुंबात आनंद आणि शांतता टिकवून ठेवायची असेल, तर खालील गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे.

वास्तूनुसार, घरातून काम करताना दक्षिण किंवा पश्चिम दिशा निवडणे उत्तम असते. म्हणजेच, जर तुम्ही लॅपटॉपवर काम करत असाल, तर लॅपटॉप दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे सर्वोत्तम आहे. या दिशेला लॅपटॉप ठेवल्याने तुमच्या जीवनात आणि कामात सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यास मदत होईल. असे केल्याने तुम्हाला मनःशांती मिळण्यासही मदत होईल. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष वाढते आणि कर्मचाऱ्यांना कामात यश मिळते. असे केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंधही सुधारतील.

ज्या टेबलावर तुम्ही लॅपटॉप किंवा पुस्तके ठेवलेली असतात, ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवा. तुम्ही कचरा नसलेल्या स्वच्छ जागेत काम केले पाहिजे. टेबलावरील कागदपत्रे आणि अनावश्यक वस्तू तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे कामातील अनेक गोष्टींमध्ये अडथळा तर येतोच, शिवाय तणावही वाढतो. म्हणून, टेबल नेहमी स्वच्छ ठेवणे चांगले.

तुमच्या कॉम्प्युटर डेस्कवर किंवा तुम्ही काम करत असलेल्या खोलीत सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वस्तू ठेवा. काही प्रकारचे सुविचार, चित्रे किंवा पुतळे ठेवणे चांगले असते. हे मनाला आनंद आणि शांती देण्यासाठी खूप चांगले आहे. कारण जेव्हा तुम्हाला थकवा किंवा तणाव जाणवतो, तेव्हा या गोष्टी तुमच्या समोर असल्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा आणि शांती मिळण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, आरशासमोर काम करू नका कारण प्रतिबिंबांमुळे नेहमी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

तुमच्या कॉम्प्युटर डेस्कवर चाकू सारख्या धारदार वस्तू कधीही ठेवू नका. यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात. असेही मानले जाते की यामुळे आपली मनःशांती भंग पावते आणि मानसिक ताण वाढतो. म्हणून, तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी तुमच्या सभोवतालच्या गोष्टींमध्ये बदल करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही

Follow Us
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख....
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे......
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात.