AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणाच्या श्रापामुळे संपला श्री कृष्णाचा वंश? महाभारतानंतर नेमके काय घडले?

महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर, युधिष्ठिराचा राज्याभिषेक होत असताना, कौरवांची माता गांधारी यांनी महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाला दोषी ठरवले आणि..

कोणाच्या श्रापामुळे संपला श्री कृष्णाचा वंश? महाभारतानंतर नेमके काय घडले?
श्री कृष्णImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 02, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई : अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या (Mahabharta) युद्धात रक्तपाताशिवाय काहीही साध्य झाले नाही. या युद्धात कौरवांचे संपूर्ण कुळ उद्ध्वस्त झाले, तसेच पाच पांडव वगळता पांडव कुळातील बहुतेक लोकं मारले गेले पण या युद्धामुळे युद्धानंतर आणखी एक राजवंश नष्ट झाला, तो म्हणजे श्री कृष्णाचा यदुवंश (How Shri Krishna Died).

गांधारीने दिला होता यदुवंशाच्या नाशाचा शाप

महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर, युधिष्ठिराचा राज्याभिषेक होत असताना, कौरवांची माता गांधारी यांनी महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाला दोषी ठरवले आणि कौरव वंशाचा जसा नाश झाला तसा यदुवंशाचाही नाश होईल असा शाप दिला. गांधारीच्या शापामुळे विनाशाची वेळ आल्याने श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि यदुवंशियांसह प्रयत्नक्षेत्रात आले. यदुवंशी यांनी सोबत खाद्यपदार्थांची दुकानेही आणली होती. कृष्णाने यदुवंशीयांना ब्राह्मणांना अन्न देऊन मृत्यूची वाट पाहण्याचा आदेश दिला होता. काही दिवसांनी महाभारत युद्धाची चर्चा सुरू असताना सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यात वाद झाला.

सात्यकीने क्रोधित होऊन कृतवर्माचा शिरच्छेद केला. यामुळे त्यांच्यात युद्ध सुरू झाले आणि ते गटात विभागले गेले आणि एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. या लढाईत कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि मित्र सात्यकी यांच्यासह सर्व यदुवंशी मारले गेले, फक्त बब्रू आणि दारुक जिवंत राहिले. यदुवंशाचा नाश झाल्यावर कृष्णाचा मोठा भाऊ बलराम समुद्रकिनारी बसला आणि परमात्म्यामध्ये एकाग्र झाला. अशा रीतीने शेषनागाचा अवतार बलरामजी देह त्याग करून आपल्या निवासस्थानी परतले.

श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला?

युद्धानंतर ते 36 वर्षांनी द्वारकेपासून दूर असलेल्या जंगलात गेले. तेथे ते एका झाडाखाली विसावले. तेव्हा एका शिकाऱ्याने श्रीकृष्णाला हरण समजले आणि त्यांच्यावर बाण सोडला. जो त्यांच्या डाव्या पायाला लागला. तेव्हा कृष्ण एकटेच होते. जेव्हा शिकारी तिथे पोहोचला आणि कृष्णाला बाण मारलेला पाहून पश्चात्ताप करू लागला तेव्हा कृष्ण म्हणाले, यात तुझी चूक नाही. त्रेतायुगात मी राम आणि तू बाली होतास. त्यावेळी तू माझ्यामुळे मारला गेलास. म्हणूनच तू मला बाण मारलास आणि तुझ्या हातून माझा मृत्यू होईल, असे म्हणत कृष्णाने प्राण सोडले.

तेव्हा ही जागा जंगल होती, पण नंतर कृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडले ते ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले. या ठिकाणाचे नाव भालका तीर्थ आहे. हे ठिकाण गुजरातच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या सौराष्ट्रातील वेरावळमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडला त्या ठिकाणी भालका तीर्थ नावाचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरामागे अशीही कथा आहे की झारा नावाच्या शिकारीच्या बाणाने त्यांचा जीव घेतला, त्याने येथे पूजा सुरू केली. नंतर येथे मंदिर बांधण्यात आले.

श्रीमद भागवतानुसार श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या घरी गेल्याची माहिती त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनीही या दु:खामुळे आपला प्राण त्याग केला. देवकी, रोहिणी, वासुदेव, बलरामजींच्या पत्नी, श्रीकृष्णाच्या पटराणी इत्यादी सर्वांनी देह सोडला. यानंतर अर्जुनाने यदुवंशासाठी पिंडदान आणि श्राद्ध विधी केले.

या विधींनंतर अर्जुन यदुवंशातील उरलेल्या लोकांसह इंद्रप्रस्थला परतला. यानंतर श्रीकृष्णाचे निवासस्थान सोडून बाकी द्वारका समुद्रात बुडाली. त्यानंतर सर्व पांडवांनीही हिमालयाच्या दिशेने प्रवास सुरू केला. या प्रवासातच पांडवांनीही एक एक करून देह सोडला. शेवटी युधिष्ठिर शरीराने स्वर्गात पोहोचला होता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.