AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garuda Purana : जर तुम्ही या 5 सवयी सोडल्या तर यश आपोआप तुमच्याकडे येईल

गरुड पुराण केवळ स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, मृत्यू याविषयी सांगत नाही, तर ते ज्ञान, वैराग्य, त्याग, तपस्या, जप, पुण्य, धोरण आणि नियम याविषयी देखील सांगते. गरुड पुराणातील या गोष्टी एखाद्याच्या जीवनात लागू केल्याने, व्यक्ती आपले जीवन सुधारू शकते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करू शकते.

Garuda Purana : जर तुम्ही या 5 सवयी सोडल्या तर यश आपोआप तुमच्याकडे येईल
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 11, 2021 | 3:05 PM
Share

नवी दिल्ली : गरुड पुराण हे सनातन धर्मातील 16 पुराणांपैकी एक मानले जाते. त्याची प्रमुख देवता विष्णू आहे. असे मानले जाते की गरुड पुराणात जे काही लिहिले आहे, जगाचे पालन करणारे भगवान विष्णू यांनी स्वतः ते स्वतःच्या तोंडाने सांगितले आहे. या महापुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि नारायण यांच्यातील संभाषणाचा उल्लेख आहे. गरुडाने सर्व प्रश्न देवाला विचारले आहेत, ज्याचे उत्तर नारायणाने दिले आहे. (If you give up these five habits, success will come to you automatically)

गरुड पुराण केवळ स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, मृत्यू याविषयी सांगत नाही, तर ते ज्ञान, वैराग्य, त्याग, तपस्या, जप, पुण्य, धोरण आणि नियम याविषयी देखील सांगते. गरुड पुराणातील या गोष्टी एखाद्याच्या जीवनात लागू केल्याने, व्यक्ती आपले जीवन सुधारू शकते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करू शकते. येथे जाणून घ्या अशा 5 सवयींबद्दल ज्या एखाद्या व्यक्तीने सोडल्या तर त्याला यशाच्या मागे कधीच पळावे लागणार नाही. यश आपोआप त्याच्याकडे येईल.

राग

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. राग हा व्यक्तीकडून त्याची विचारशक्ती समजूजदारपणा काढून घेतो. अशा स्थितीत अनेक वेळा माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि त्याच्याकडे येणाऱ्या गोष्टीही त्याच्या हातातून जातात. त्यामुळे रागाची सवय सोडा.

मत्सर

मत्सर एखाद्या व्यक्तीचा मौल्यवान वेळ नष्ट करतो. स्वतःच्या गोष्टींवर मेहनत करण्याऐवजी ती व्यक्ती इतरांना खाली खेचण्याचा विचार करते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती स्वतःची प्रतिभा नष्ट करते आणि सक्षम असूनही तो यश मिळवू शकत नाही.

आळस

तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्ही तुमचा वेळ आळशीपणे वाया घालवला तर तुम्ही आयुष्यात कधीही यश मिळवू शकणार नाही. म्हणून जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर आळस सोडा.

संशय

तुम्ही कोणताही निर्णय घ्या, त्याच्या परिणामांचा काळजीपूर्वक विचार करा आणि एकदा निर्णय घेतला की शंका घेऊ नका. आपल्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि कठोर प्रयत्न करा. शंका तुमचा निर्णय कमकुवत करण्याचे काम करते आणि ते तुमचे यश हिरावून घेते. त्यामुळे संशयाची सवय सोडा.

चिंता

चिंता चितासारखी मानली जाते, जी एखाद्या व्यक्तीला आतून पोकळ बनवते. म्हणून व्यर्थ चिंता करण्याची सवय सोडून द्या. जर तुम्हाला काही करायचे असेल तर त्याचा विचार करा. विचार करून तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान मिळेल. (If you give up these five habits, success will come to you automatically)

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसाधारण हित लक्षात घेऊन येथे सादर करण्यात आले आहे.)

इतर बातम्या

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय?; ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचा आजच आहारात समावेश करा!

सोलापूरसह राज्यातील 16 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार, वाचा कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?