AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : ऑफिसमध्ये तुम्हालाही प्रमोशन आणि कौतुक हवं आहे? मग आर्य चाणक्य यांच्या या नीती अमलात आणा, यश तुमचंच

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ, विचारवंत आणि राजनीतीतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्यनीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे.

Chanakya Neeti : ऑफिसमध्ये तुम्हालाही प्रमोशन आणि कौतुक हवं आहे? मग आर्य चाणक्य यांच्या या नीती अमलात आणा, यश तुमचंच
| Updated on: May 04, 2025 | 9:16 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ, विचारवंत आणि राजनीतीतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्यनीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. आज आपण चाणक्य यांच्या त्या नीतींबाबत चर्चा करणार आहोत, ज्याचा फायदा हा कॉरपोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होऊ शकतो.

नेतृत्व – आर्य चाणक्य म्हणतात की तुम्ही जेव्हा एखाद्या समूहाचं नेतृत्व करत असतात तेव्हा फक्त प्रामाणिकपणाने काम होत नाही तर त्याच्यासोबत एका विशिष्ट रणनीतीची देखील आवश्यकता असते.तुम्हाला जे वाटतं त्याबद्दल तुम्ही ऑफीसमध्ये बोललं पाहिजे. मात्र ते बोलत असताना कधी, कसं, कोणासमोर बोलत आहात याचं देखील भान तुम्हाला असायला हवं. समजदारीनं काम करणं हीच खरी लिडरशिप असल्याचं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

पूर्ण नियोज करा – आर्य चाणक्य म्हणतात कोणतंही काम करण्यापूर्वी त्याचं पूर्ण नियोजन तयार करा. तुम्ही जेव्हा एखादं नवं काम सुरू करता तेव्हा ज्या पद्धतीनं नियोजनाची गरज असते तशाच पद्धतीने कोणतंही काम करताना आधी तुम्ही कामाचं नियोजन करा, आणि मग कामाला सुरुवात करा तुम्हाला यश नक्की मिळेल.

दुसऱ्यांच्या चुकातून धडा घ्या – आर्य चाणक्य यांनी ही एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ऑफीसमध्ये काम करत असताना अनेकांकडून चुका होत असतात. मात्र तुम्हाला गरज असते ती त्या चुकांमधून धडा घेण्याची. तुमच्या सहकाऱ्याने जर एखादी चूक केली तर त्या चुकीतून तुम्ही शिका आणि पुन्हा तीच चूक करू नका.

स्वत:ला कणखर बनवा – आर्य चाणक्य म्हणतात व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. त्यामुळे तुम्ही स्वत:ला कणखर बनवा.

कोणालाही दुखवू नका – आर्य चाणक्य यांनी हा सर्वात महत्त्वाचा गुण सांगितला आहे, क्षेत्र कोणतही असो, तुमच्या सहकार्याला तुमच्या व्यवहारामुळे दुखवू नका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....