AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 5 लोकांपासून अंतर राखणे महत्वाचं, अन्यथा जीवनात होईल फक्त नुकसानच

चाणक्य नीति ही जीवनात हुशार, ज्ञानी आणि सावध राहण्याचे मार्गदर्शक आहे. ते स्पष्ट करते की, शहाणपणाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रकारच्या राजकीय भवऱ्यात अडकण्यापासून स्वत:ला कसे वाचवू शकता.

'या' 5 लोकांपासून अंतर राखणे महत्वाचं, अन्यथा जीवनात होईल फक्त नुकसानच
| Updated on: Feb 24, 2026 | 4:12 PM
Share

आपण आपल्या आयुष्यात दररोज नवीन लोक भेटतो. काही लोक आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात, आपले मनोबल वाढवतात आणि कठीण काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्यासोबत राहणे आपलयाल प्रेरणा देते आणि प्रगती करण्यास मदत करते. मात्र अशी काही लोकं आहेत जे मित्र असल्याचे भासवतात परंतु, प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. तसेच ही लोकं तुमची सकारात्मक ऊर्जा काढून टाकतात. तुमचे निर्णय गुंतागुंतीचे करतात आणि कधीकधी समस्या देखील निर्माण करतात. आचार्य चाणक्य सांगतात की कोणावरही पूर्णपणे विश्वास ठेवणे योग्य नाही. जीवनात सुज्ञपणे लोकांची निवड करावी. चला तर मग आजच्या लेखात आपण आपल्या आयुष्यात सुखी राहण्यासाठी कोणत्या 5 लोकांपासून अंतर राखावे ते जाणून घेऊयात.

जी लोकं नेहमी नकारात्मक असतात

चाणक्य यांच्या मते काही लोकं नेहमीच अशी असतात जी कोणत्याही कारणावरून तक्रार करत असतात आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत दोष शोधत असतात. त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुमचा मुड देखील तसाच होतो आणि तुमच्या सकारात्मक विचारसरणी कमी होऊ लागते. त्यामुळे तुम्ही अशा लोकांपासून दूर राहणेच योग्यतेचं ठरेल.

खोटं बोलणारी लोकं

चाणक्य नेहमी सांगतात की विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो, परंतु काही लोकं विनाकारण खोटे बोलतात. गरज पडल्यास ज्या व्यक्तीवर तुम्ही जास्त विश्वास ठेवला आहे ती तुमच्या विरुद्ध काम करू शकतात. अशा लोकांवर जास्त विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते.

आळशी आणि निष्क्रिय लोक

एखादी व्यक्ती कितीही हुशार असली पण त्या व्यक्तीला कठोर परिश्रम करण्याची सवय नसेल तर अशी लोकं तुम्हाला तुमच्या यशात मागे खेचू शकतात. आळशी लोकांसोबत काम करणे किंवा मैत्री करणे यामुळे तुमचा वेळ आणि शक्ती दोन्ही वाया जाते.

रागिष्ट आणि चिडचिडे लोकं

काही लोकं छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावतात आणि त्यांच्या सभोवतालचे वातावरण बिघडवतात. त्यांच्यासोबत तुम्ही जर वेळ घालवत असाल तर तुम्हाला ताण येऊ शकतो. अशा लोकांपासून दूर राहणेच चांगले.

फक्त स्वार्थी मित्र

काही लोकं दिखाव्यासाठी मित्र बनवतात, पण जेव्हा खरी मदतीची परिस्थिती उद्भवते तेव्हा फक्त स्वतःच्या फायद्याची काळजी घेणारी लोकं मित्र असतात. त्यांच्याशी संबंध टिकवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप.
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी.
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज.