AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharmas 2021 : खरमासात वाढेल दान-ध्यानाचं महत्त्व! ‘ही’ कामे केल्याने होईल चांगला फायदा

नुकताच खरमास महिना सुरू झाला आहे. या महिन्यात कोणत्याही प्रकारचे कोणतेही शुभ कार्य होत नाही. ज्याप्रमाणे हिंदु धर्मात चातुर्मास, श्राद्धात शुभ कार्य केले जात नाही, त्याचप्रमाणे खरमासाध्ये मांगलिक कार्ये केली जात नाहीत.

Kharmas 2021 : खरमासात वाढेल दान-ध्यानाचं महत्त्व! ‘ही’ कामे केल्याने होईल चांगला फायदा
खरमास
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 15, 2021 | 3:56 PM
Share

मुंबई : नुकताच खरमास महिना सुरू झाला आहे. या महिन्यात कोणत्याही प्रकारचे कोणतेही शुभ कार्य होत नाही. ज्याप्रमाणे हिंदु धर्मात चातुर्मास, श्राद्धात शुभ कार्य केले जात नाही, त्याचप्रमाणे खरमासाध्ये मांगलिक कार्ये केली जात नाहीत. खरमासाला ‘मालेमास’ म्हणून देखील ओळखले जाते. खरमासाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जप आणि ध्यान यांना विशेष महत्त्व आहे (Kharmas 2021 remedies upay to get happiness and prosperity).

ज्योतिष शास्त्रात या महिन्यात काही उपायांचाही उल्लेख केला आहे. असे केल्याने आनंद आणि समृद्धी येते आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. चला तर, त्या उपायांबद्दल जाणून घेऊया…

– ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सूर्यदेव यांची उपासना करण्यास विशेष महत्त्व आहे. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद व समृद्धी येते. त्याशिवाय देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात आर्थिक चणचण निर्माण होणार नाही आणि माता लक्ष्मी घरात वास करते.

– खरमासात तुळशीची उपासना केल्यास फायदे मिळतात. संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या जीवनातील त्रास कमी होईल.

– खरमासात कुंभ स्नान करणे आणि तीर्थक्षेत्र दर्शनास विशेष महत्त्व आहे. याशिवाय घरी भगवद्गीतेचे पठण करणे देखील शुभ आहे. यामुळे घरात सकारात्मकता येते. त्याच वेळी, देवाची कृपा तुमच्यावर कायम राहील.

– आपल्यावर कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट असल्यास पिंपळाची पूजा करणे शुभ आहे. सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर दिवा लावल्याने देव प्रसन्न होतो. खरमास पिंपळाची उपासना केल्यास कर्जापासून मुक्तता मिळते आणि आर्थिक समस्याही दूर होतात (Kharmas 2021 remedies upay to get happiness and prosperity).

– खरमामध्ये पंचमृताने भगवान शालिग्रामाला दररोज अभिषेक केल्याने जीवनात शुभ परिणाम दिसून येतो.

खरमास कधी सुरू होतोय?

हिंदू दिनदर्शिकेनुसार, खरमास 14 मार्च ते 14  एप्रिल या काळात असणार आहे. त्याला सूर्याची मीन संक्रांत देखील म्हटले जाते. जेव्हा, सूर्य मीनमधून बाहेर पडतो आणि मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा खरमास संपेल. जेव्हा सूर्य धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो, तेव्हा खरमस वर्षातून दोनदा होतो.

‘ही’ कामे निषिद्ध

खरमास महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश, गृहनिर्माण, मुंडन अशी शुभ कामे निषिद्ध आहेत. वास्तविक, खरमास दरम्यान सूर्य जवळ असल्यामुळे गुरूची क्रिया बर्‍याचदा कमी होते, तर मंगलिक कार्यांसाठी बृहस्पति मजबूत असणे आवश्यक आहे.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Kharmas 2021 remedies upay to get happiness and prosperity)

हेही वाचा :

Mahashivaratri 2021 | महाकालेश्वराची जगप्रसिद्ध ‘भस्म आरती’, वाचा कशी सुरु झाली ‘ही’ आरती…

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?