AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharmas 2021 : खरमासात वाढेल दान-ध्यानाचं महत्त्व! ‘ही’ कामे केल्याने होईल चांगला फायदा

नुकताच खरमास महिना सुरू झाला आहे. या महिन्यात कोणत्याही प्रकारचे कोणतेही शुभ कार्य होत नाही. ज्याप्रमाणे हिंदु धर्मात चातुर्मास, श्राद्धात शुभ कार्य केले जात नाही, त्याचप्रमाणे खरमासाध्ये मांगलिक कार्ये केली जात नाहीत.

Kharmas 2021 : खरमासात वाढेल दान-ध्यानाचं महत्त्व! ‘ही’ कामे केल्याने होईल चांगला फायदा
खरमास
| Updated on: Mar 15, 2021 | 3:56 PM
Share

मुंबई : नुकताच खरमास महिना सुरू झाला आहे. या महिन्यात कोणत्याही प्रकारचे कोणतेही शुभ कार्य होत नाही. ज्याप्रमाणे हिंदु धर्मात चातुर्मास, श्राद्धात शुभ कार्य केले जात नाही, त्याचप्रमाणे खरमासाध्ये मांगलिक कार्ये केली जात नाहीत. खरमासाला ‘मालेमास’ म्हणून देखील ओळखले जाते. खरमासाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जप आणि ध्यान यांना विशेष महत्त्व आहे (Kharmas 2021 remedies upay to get happiness and prosperity).

ज्योतिष शास्त्रात या महिन्यात काही उपायांचाही उल्लेख केला आहे. असे केल्याने आनंद आणि समृद्धी येते आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. चला तर, त्या उपायांबद्दल जाणून घेऊया…

– ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सूर्यदेव यांची उपासना करण्यास विशेष महत्त्व आहे. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद व समृद्धी येते. त्याशिवाय देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात आर्थिक चणचण निर्माण होणार नाही आणि माता लक्ष्मी घरात वास करते.

– खरमासात तुळशीची उपासना केल्यास फायदे मिळतात. संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या जीवनातील त्रास कमी होईल.

– खरमासात कुंभ स्नान करणे आणि तीर्थक्षेत्र दर्शनास विशेष महत्त्व आहे. याशिवाय घरी भगवद्गीतेचे पठण करणे देखील शुभ आहे. यामुळे घरात सकारात्मकता येते. त्याच वेळी, देवाची कृपा तुमच्यावर कायम राहील.

– आपल्यावर कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट असल्यास पिंपळाची पूजा करणे शुभ आहे. सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर दिवा लावल्याने देव प्रसन्न होतो. खरमास पिंपळाची उपासना केल्यास कर्जापासून मुक्तता मिळते आणि आर्थिक समस्याही दूर होतात (Kharmas 2021 remedies upay to get happiness and prosperity).

– खरमामध्ये पंचमृताने भगवान शालिग्रामाला दररोज अभिषेक केल्याने जीवनात शुभ परिणाम दिसून येतो.

खरमास कधी सुरू होतोय?

हिंदू दिनदर्शिकेनुसार, खरमास 14 मार्च ते 14  एप्रिल या काळात असणार आहे. त्याला सूर्याची मीन संक्रांत देखील म्हटले जाते. जेव्हा, सूर्य मीनमधून बाहेर पडतो आणि मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा खरमास संपेल. जेव्हा सूर्य धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो, तेव्हा खरमस वर्षातून दोनदा होतो.

‘ही’ कामे निषिद्ध

खरमास महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश, गृहनिर्माण, मुंडन अशी शुभ कामे निषिद्ध आहेत. वास्तविक, खरमास दरम्यान सूर्य जवळ असल्यामुळे गुरूची क्रिया बर्‍याचदा कमी होते, तर मंगलिक कार्यांसाठी बृहस्पति मजबूत असणे आवश्यक आहे.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Kharmas 2021 remedies upay to get happiness and prosperity)

हेही वाचा :

Mahashivaratri 2021 | महाकालेश्वराची जगप्रसिद्ध ‘भस्म आरती’, वाचा कशी सुरु झाली ‘ही’ आरती…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.