AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahabharat Story : महाभारत लिहायला किती वर्ष लागली होती? गणपतीने महर्षी व्यासांसमोर ठेवली होती ‘ही’ अट

भगवान गणेशाने स्वतःच्या हाताने महाभारत (Mahabharat Story) काव्य लिहिले. पौराणिक कथेनुसार, शिक्षणासोबतच श्रीगणेशाला लेखनाचाही स्वामी मानले जाते. गणेशाला सर्व देवतांमध्ये सर्वात धैर्यवान मानले गेले आहे.

Mahabharat Story : महाभारत लिहायला किती वर्ष लागली होती? गणपतीने महर्षी व्यासांसमोर ठेवली होती 'ही' अट
महर्षी वेद व्यास आणि श्री गणेश Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 24, 2023 | 10:15 AM
Share

मुंबई : गणपतीला आद्य देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाचे ध्यान केले जाते. असे मानले जाते की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा आणि स्तुती केल्याने कामातील अडथळे दूर होतात. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. भगवान गणेशाने स्वतःच्या हाताने महाभारत (Mahabharat Story) काव्य लिहिले. पौराणिक कथेनुसार, शिक्षणासोबतच श्रीगणेशाला लेखनाचाही स्वामी मानले जाते. गणेशाला सर्व देवतांमध्ये सर्वात धैर्यवान मानले गेले आहे. त्यांचे मन स्थिर आणि शांत असल्याचे सांगितले जाते. परिस्थिती कशीही असली तरी त्यांचा संयम सुटत नाही. आपले काम शांतपणे करत राहातात. या कारणास्तव त्यांची लेखन शक्ती देखील अद्वितीय मानली गेली आहे. गणेशाच्या या गुणाने महर्षी वेद व्यास प्रभावित झाले.

गणपतीने महर्षी व्यासांसमोर ठेवली होती ही अट

महर्षि वेदव्यास यांनी जेव्हा महाभारत रचण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते महाभारतासारख्या महाकाव्यासाठी अशा लेखकाच्या शोधात होते, जो त्यांच्या कथन आणि विचारांमध्ये व्यत्यय न आणता लेखन करत राहील. कारण जेव्हा एखादा अडथळा येतो तेव्हा विचारांच्या निरंतर प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

महर्षी वेद व्यास यांनी सर्व देवी-देवतांच्या क्षमतांचा अभ्यास केला पण ते समाधानी झाले नाहीत तेव्हा त्यांचे लक्ष गणेशाकडे वेधले गेले. महर्षी वेद व्यासांनी गणेशाजवळ जाऊन एक महाकाव्य लिहिण्याची विनंती केली. भगवान गणेशजींनी वेद व्यासजींची विनंती मान्य केल पण त्यांच्यासमोर एक अट ठेवली. अटीनुसार, लिखान सुरू केल्यानंतर, एक क्षणही कथा सांगणे थांबता येणार नाही, आणि असे झाल्यास ते लिखानाचे काम तिथेच थांबवतील. महर्षी वेद व्यास यांनी गणपतीची ही अट मान्य केली, पण त्यांनी गणेशासमोर एक अटही ठेवली. महर्षी वेद व्यास म्हणाले की मी सांगीलेल्या श्लोकाचा अर्थ लिहीन्याआधी तुम्हाला समजून सांगावा लागेल.

याचा अर्थ गणेशाला प्रत्येक शब्द समजून घेऊनच लिहायचे होते. महर्षी वेद व्यास यांची ही अट गणपतीने मान्य केली. यानंतर महाभारत महाकाव्याची रचना सुरू झाली. महाभारताचे लेखन पूर्ण होण्यास तीन वर्षे लागली असे म्हणतात. या तीन वर्षांत गणपतीने महर्षी वेद व्यासांना एक क्षणही थांबवले नाही, तर महर्षींनीही त्यांची अट पूर्ण केली. अशा प्रकारे महाभारत पूर्ण झाले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?