AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahabharat Story : द्रौपदीच्या या पाच चुकांमुळे घडले महाभारत, या घटनांमुळे पडली युद्धाची ठिणगी!

आज आम्ही तुम्हाला द्रौपदीच्या (Draupadi) त्या पाच चुका सांगणार आहोत, ज्यांच्यामुळे महाभारताची संपूर्ण कथाच बदलून गेली.

Mahabharat Story : द्रौपदीच्या या पाच चुकांमुळे घडले महाभारत, या घटनांमुळे पडली युद्धाची ठिणगी!
द्रौपदीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 21, 2023 | 10:43 AM
Share

मुंबई : द्रौपदी हे महाभारतातील (Reason of Mahabharta) महत्त्वाचे पात्र आहे. द्रौपदीचे जीवन आणि चरित्र समजून घेणे फार कठीण आहे. त्याला फक्त कृष्णच समजू शकला. द्रौपदी श्रीकृष्णाची मैत्रीण होती. मित्रालाच मित्र समजू शकतो. आज आम्ही तुम्हाला द्रौपदीच्या (Draupadi) त्या पाच चुका सांगणार आहोत, ज्यांच्यामुळे महाभारताची संपूर्ण कथाच बदलून गेली. द्रौपदीने या चुका केल्या नसत्या तर आज इतिहास वेगळा असता. थोडक्यात द्रौपदीने केलेल्या या चुकांमुळे महाभारताच्या युद्धाची ठिणगी पडली.

1. स्वयंवरात कर्णाचा अपमान

द्रौपदीला कर्ण हवा होता, पण कर्ण सुताचा मुलगा आहे हे कळल्यावर तिचा विचार बदलला. द्रौपदीने पहिले कर्णाला स्वयंवर स्पर्धेत भाग घेऊ दिला नाही आणि दुसरे म्हणजे तिने कर्णाचा अपमान केला. तिने तसे केले नसते तर निकाल वेगळा लागला असता. द्रौपदीच्या वडिलांनी द्रोणाचार्याचा वध करण्याची शपथ घेतलीshri होती आणि अर्जुनाशिवाय दुसरा कोणीही त्यांचा वध करू शकत नाही, त्यामुळे आपल्या मुलीचे लग्न अर्जुनाशीच व्हावे अशी त्यांची इच्छा होती.

2. पांडवांची पत्नी होणे स्वीकारणे

अर्जुनाने स्वयंवर स्पर्धा जिंकली होती, परंतु कोणत्याही परिस्थितीत द्रौपदीने पाच पांडवांची पत्नी होण्याचे मान्य केले नसते तर आजचा इतिहास वेगळा असता. स्वयंवरानंतर कुंतीच्या सांगण्यावरून किंवा युधिष्ठिर आणि वेद व्यासजींच्या सांगण्यावरून द्रौपदीने पाचही जणांशी लग्न करण्यास होकार दिला होता.

3. दुर्योधनाचा अपमान

इंद्रप्रस्थमध्ये युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वेळी दुर्योधनाला द्रौपदी म्हणाली होती, ‘आंधळ्याचा मुलगाही आंधळा असतो.’ हीच गोष्ट दुर्योधनाच्या हृदयात बाणासारखी घुसली. यामुळेच जुगारात द्रौपदीला पणाला लावण्यासाठी तयार केले. जुग महाभारत युद्धाची महत्त्वाची घटना होती जिथे द्रौपदीचे अपहरण झाले होते.

4. द्रौपदीने युद्धासाठी प्रवृत्त केले

वस्त्र हरणानंतर द्रौपदी पांडवांना म्हणाली की जर तुम्ही माझ्या अपमानाचा दुर्योधन आणि त्याच्या भावांकडून बदला घेतला नाही तर तुम्ही कलंकीत आहात. द्रौपदीने पांडवांना सांगितले की, जोपर्यंत दुर्योधनाचा रक्तपात होत नाही तोपर्यंत माझे केस मोकळे राहतील. त्यावेळी द्रौपदीने ऋतुस्नान केले नव्हते. अशा स्थितीत भीमाने शपथ घेतली की तो दुर्योधनाची मांडी आपल्या गदेने तोडेल आणि दुशासनाची छाती फाडून त्याचे रक्तपात करेल. चिरहरणाच्या वेळी द्रौपदीला वाचवण्याऐवजी कर्ण म्हणाला, ‘जी स्त्री पाच पतींसोबत राहू शकते तिचा आदर काय?’ या गोष्टीने द्रौपदी दुखावली गेली आणि ती अर्जुनाला कर्णाशी लढण्यासाठी सतत भडकवत राहिली.

5. जयद्रथाची वाईट नजर

जुगारात सर्वस्व गमावून पांडव वनवासाची शिक्षा भोगत असताना दुर्योधनाचा मेहुणा जयद्रथाची वाईट नजर द्रौपदीवर पडली. त्याने द्रौपदीला जबरदस्ती केली आणि तिला रथावर बसविण्याचे धाडसही केले पण पांडवांनी वेळीच येऊन तिला वाचवले. पांडवांना जयद्रथला तेथे मारायचे होते पण द्रौपदीने पांडवांना तसे करण्यापासून रोखले ही तिची मोठी चूक होती. द्रौपदीने जयद्रथला मुंडण करणयाची शिक्षा केली आणि सर्व लोकांसमोर त्याचा अपमान केला. जयद्रथ कुणालाही तोंड दाखवू शकला नाही आणि प्रत्येक क्षणी अपमान सहन करत राहीला. या अपमानाचा बदला जयद्रथाने चक्रव्यूहात अडकलेल्या अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूला मारून घेतला.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...