AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणासाठी मकर संक्रांतीला आहे विषेश महत्व, उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?

उत्तरायणाचा काळ हा देवतांचा दिवस आणि दक्षिणायणाची वेळ ही देवतांची रात्र आहे अशी धार्मिक मान्यता आहे.

'या' कारणासाठी मकर संक्रांतीला आहे विषेश महत्व, उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?
उत्तरायणImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 08, 2023 | 1:28 PM
Share

मुंबई, उत्तरायणला (Uttrayan) देवांचे अयान म्हटले जाते, हा काळ पुण्यपूर्ण मानला जातो. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते, धार्मिक मान्यतेनूसार उत्तरायणात मृत्यू आला तरी मोक्ष मिळण्याची शक्यता असते. अयान म्हणजे फिरणे, सूर्य वर्षभर फिरतो आणि ऋतू सूर्याच्या टप्प्यांनुसार ठरतात. आयन दोन प्रकारचे असतात. अयान म्हणजे सूर्याच्या उत्तर दिशेला होणाऱ्या हालचालीला उत्तरायण आणि दक्षिण दिशेला असलेल्या अयानला दक्षिणायन (Dakshinayan) म्हणतात. अशा रीतीने वर्षभरात दोन आयन असतात आणि दोन्ही सहा महिने टिकतात, ज्याला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. 6 महिने सूर्य पूर्वेला उगवतो आणि दक्षिणेला मावळतो आणि 6 महिने उत्तरेला उगवितो आणि पश्चिमेला मावळतो.

उत्तरायण आणि दक्षिणायन

हिंदू पंचांगानुसार एका वर्षात दोन आयन असतात, म्हणजेच वर्षातून दोनदा सूर्याच्या स्थितीत बदल होतो आणि या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीतून मिथुन राशीत जातो, तेव्हापर्यंतच्या काळाला उत्तरायण म्हणतात. हा कालावधी 6 महिन्यांचा असतो, त्यानंतर सूर्य कर्क राशीतून धनु राशीत जातो, त्या काळाला दक्षिणायन म्हणतात. हा कालावधीही सहा महिन्यांचा आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, एका वर्षात सहा ऋतू असतात. जेव्हा सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा शिशिर, वसंत आणि उन्हाळा असे तीन ऋतू येतात आणि जेव्हा सूर्य दक्षिणायनमध्ये असतो तेव्हा पावसाळा, शरद ऋतू आणि हेमंत ऋतू असतात.

शुभ कार्यांना होते सुर्वात

यासोबतच उत्तरायणाचा काळ हा देवतांचा दिवस आणि दक्षिणायणाची वेळ ही देवतांची रात्र आहे अशी धार्मिक मान्यता आहे. वैदिक काळात उत्तरायणाला देवयान आणि दक्षिणायनाला पितृयान म्हणतात. मकर संक्रांतीनंतर, माघ महिन्यात, उत्तरायणापासून सर्व शुभ कार्ये सुरू होतात. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे मकर राशीत जाणे फार महत्वाचे मानले जाते. वास्तविक, सूर्यदेव आपल्या पुत्राच्या राशीत प्रवेश करत असतात. पुत्राच्या राशीमध्ये पित्याचा प्रवेश पुण्यवान असण्याबरोबरच पापांचाही नाश करतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.