AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणासाठी मकर संक्रांतीला आहे विषेश महत्व, उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?

उत्तरायणाचा काळ हा देवतांचा दिवस आणि दक्षिणायणाची वेळ ही देवतांची रात्र आहे अशी धार्मिक मान्यता आहे.

'या' कारणासाठी मकर संक्रांतीला आहे विषेश महत्व, उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?
उत्तरायणImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 08, 2023 | 1:28 PM
Share

मुंबई, उत्तरायणला (Uttrayan) देवांचे अयान म्हटले जाते, हा काळ पुण्यपूर्ण मानला जातो. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते, धार्मिक मान्यतेनूसार उत्तरायणात मृत्यू आला तरी मोक्ष मिळण्याची शक्यता असते. अयान म्हणजे फिरणे, सूर्य वर्षभर फिरतो आणि ऋतू सूर्याच्या टप्प्यांनुसार ठरतात. आयन दोन प्रकारचे असतात. अयान म्हणजे सूर्याच्या उत्तर दिशेला होणाऱ्या हालचालीला उत्तरायण आणि दक्षिण दिशेला असलेल्या अयानला दक्षिणायन (Dakshinayan) म्हणतात. अशा रीतीने वर्षभरात दोन आयन असतात आणि दोन्ही सहा महिने टिकतात, ज्याला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. 6 महिने सूर्य पूर्वेला उगवतो आणि दक्षिणेला मावळतो आणि 6 महिने उत्तरेला उगवितो आणि पश्चिमेला मावळतो.

उत्तरायण आणि दक्षिणायन

हिंदू पंचांगानुसार एका वर्षात दोन आयन असतात, म्हणजेच वर्षातून दोनदा सूर्याच्या स्थितीत बदल होतो आणि या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीतून मिथुन राशीत जातो, तेव्हापर्यंतच्या काळाला उत्तरायण म्हणतात. हा कालावधी 6 महिन्यांचा असतो, त्यानंतर सूर्य कर्क राशीतून धनु राशीत जातो, त्या काळाला दक्षिणायन म्हणतात. हा कालावधीही सहा महिन्यांचा आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, एका वर्षात सहा ऋतू असतात. जेव्हा सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा शिशिर, वसंत आणि उन्हाळा असे तीन ऋतू येतात आणि जेव्हा सूर्य दक्षिणायनमध्ये असतो तेव्हा पावसाळा, शरद ऋतू आणि हेमंत ऋतू असतात.

शुभ कार्यांना होते सुर्वात

यासोबतच उत्तरायणाचा काळ हा देवतांचा दिवस आणि दक्षिणायणाची वेळ ही देवतांची रात्र आहे अशी धार्मिक मान्यता आहे. वैदिक काळात उत्तरायणाला देवयान आणि दक्षिणायनाला पितृयान म्हणतात. मकर संक्रांतीनंतर, माघ महिन्यात, उत्तरायणापासून सर्व शुभ कार्ये सुरू होतात. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे मकर राशीत जाणे फार महत्वाचे मानले जाते. वास्तविक, सूर्यदेव आपल्या पुत्राच्या राशीत प्रवेश करत असतात. पुत्राच्या राशीमध्ये पित्याचा प्रवेश पुण्यवान असण्याबरोबरच पापांचाही नाश करतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....