AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणासाठी मकर संक्रांतीला आहे विषेश महत्व, उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?

उत्तरायणाचा काळ हा देवतांचा दिवस आणि दक्षिणायणाची वेळ ही देवतांची रात्र आहे अशी धार्मिक मान्यता आहे.

'या' कारणासाठी मकर संक्रांतीला आहे विषेश महत्व, उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?
उत्तरायणImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 08, 2023 | 1:28 PM
Share

मुंबई, उत्तरायणला (Uttrayan) देवांचे अयान म्हटले जाते, हा काळ पुण्यपूर्ण मानला जातो. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते, धार्मिक मान्यतेनूसार उत्तरायणात मृत्यू आला तरी मोक्ष मिळण्याची शक्यता असते. अयान म्हणजे फिरणे, सूर्य वर्षभर फिरतो आणि ऋतू सूर्याच्या टप्प्यांनुसार ठरतात. आयन दोन प्रकारचे असतात. अयान म्हणजे सूर्याच्या उत्तर दिशेला होणाऱ्या हालचालीला उत्तरायण आणि दक्षिण दिशेला असलेल्या अयानला दक्षिणायन (Dakshinayan) म्हणतात. अशा रीतीने वर्षभरात दोन आयन असतात आणि दोन्ही सहा महिने टिकतात, ज्याला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. 6 महिने सूर्य पूर्वेला उगवतो आणि दक्षिणेला मावळतो आणि 6 महिने उत्तरेला उगवितो आणि पश्चिमेला मावळतो.

उत्तरायण आणि दक्षिणायन

हिंदू पंचांगानुसार एका वर्षात दोन आयन असतात, म्हणजेच वर्षातून दोनदा सूर्याच्या स्थितीत बदल होतो आणि या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीतून मिथुन राशीत जातो, तेव्हापर्यंतच्या काळाला उत्तरायण म्हणतात. हा कालावधी 6 महिन्यांचा असतो, त्यानंतर सूर्य कर्क राशीतून धनु राशीत जातो, त्या काळाला दक्षिणायन म्हणतात. हा कालावधीही सहा महिन्यांचा आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, एका वर्षात सहा ऋतू असतात. जेव्हा सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा शिशिर, वसंत आणि उन्हाळा असे तीन ऋतू येतात आणि जेव्हा सूर्य दक्षिणायनमध्ये असतो तेव्हा पावसाळा, शरद ऋतू आणि हेमंत ऋतू असतात.

शुभ कार्यांना होते सुर्वात

यासोबतच उत्तरायणाचा काळ हा देवतांचा दिवस आणि दक्षिणायणाची वेळ ही देवतांची रात्र आहे अशी धार्मिक मान्यता आहे. वैदिक काळात उत्तरायणाला देवयान आणि दक्षिणायनाला पितृयान म्हणतात. मकर संक्रांतीनंतर, माघ महिन्यात, उत्तरायणापासून सर्व शुभ कार्ये सुरू होतात. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे मकर राशीत जाणे फार महत्वाचे मानले जाते. वास्तविक, सूर्यदेव आपल्या पुत्राच्या राशीत प्रवेश करत असतात. पुत्राच्या राशीमध्ये पित्याचा प्रवेश पुण्यवान असण्याबरोबरच पापांचाही नाश करतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?