AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangalwar Upay : मंगळवारच्या दिवशी केलेले हे चार उपाय करतील चार मोठ्या समस्यांतून सुटका

धर्म आणि ज्योतिष्यानुसार मंगळवार हनुमानाचा अत्यंत प्रिय दिवस आहे. म्हणून या दिवशी मनापासून हनुमानाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्ती होते. यासोबतच मंगळ ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात.

Mangalwar Upay : मंगळवारच्या दिवशी केलेले हे चार उपाय करतील चार मोठ्या समस्यांतून सुटका
हनुमानImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 28, 2023 | 2:28 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात मंगळवार (Mangalwar Upay) हा हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी विधीपूर्वक हनुमानजीची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. असे म्हणतात की, हनुमानजी प्रसन्न झाले तर माणसाच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. जर एखाद्या व्यक्तीला नोकरीची चिंता असेल किंवा पैसे मिळण्याबाबत समस्या येत असतील तर मंगळवारी केलेले हे उपाय त्या व्यक्तीला या समस्येतून बाहेर काढते. मंगळवारी करावयाच्या या उपायांबद्दल जाणून घेऊया.

मंगळवारी करा हे चार उपाय

  1. जर तुम्हाला नोकरीची चिंता असेल, नोकरी मिळत नसेल किंवा वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर निराश होण्याची अजिबात गरज नाही. मंगळवारी हनुमानाची पूजा करा. या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांच्यासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. यासोबत तिथे बसून हनुमान चालीसा पाठ करा. हा उपाय केल्याने व्यक्तीचा रोजगाराचा मार्ग खुला होतो.
  2. घरात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी, कलह आणि वाद दुर करण्यासाठी मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिरात बजरंगबलीची पूजा करा. 21 मंगळवारी त्यांना गूळ आणि हरभरा अर्पण करा. 21 मंगळवारी हनुमानजींना चोळा अर्पण करा. हा उपाय नियमित आणि भक्तीभावाने केल्यास घरात सुख-समृद्धी येऊ लागते.
  3. काम किंवा वैयक्तिक जीवनात शत्रूंमुळे त्रासलेल्या लोकांनी मंगळवारी सकाळी स्नानानंतर हनुमान मंदिरात जावे. पूर्ण भक्तिभावाने बजरंगबानचे पठण करावे. 21 मंगळवारपर्यंत हा उपाय केल्यास जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील.
  4. काही गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी मंगळवारी भांड्यात पाणी घेऊन हनुमानजींच्या प्रतिमेसमोर ठेवावे. यानंतर तिथे बसून हनुमान बाहुकचा पाठ करा. पाठ पूर्ण झाल्यावर हे पाणी घ्या. यानंतर दुसरे पाणी भरून ठेवावे. असे सतत 21 मंगळवार केल्याने माणसाला त्रासदायक आजारांपासून मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.