AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitrudosh : सतत कामामध्ये येत असेल अडथळे तर, असू शकतो पितृदोष

Pitru Dosh आपण ज्या समस्यांमधून जात आहोत ते पितृदोषामुळे तर नाही ना हे अनेकदा कळू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर त्याची कारणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पितृदोषामुळे तुम्हाला किरकोळ वाटणारी समस्या असण्याची शक्यता आहे.पितृदोषामुळे व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अपत्यप्राप्तीचे सुख मिळत नाही. नोकरी आणि व्यवसायात कष्ट करूनही नुकसान सहन करावे लागते.

Pitrudosh : सतत कामामध्ये येत असेल अडथळे तर, असू शकतो पितृदोष
| Updated on: Nov 25, 2023 | 2:04 PM
Share

मुंबई : पितृदोष (Pitrudosh) अत्यंत क्लेशदायक आहे. ज्याच्या कुंडलीत पितृ दोष असतो त्याला अनेक प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यात प्रचंड समस्या येऊ लागतात. त्यामुळे पितृदोषाची लक्षणे ओळखून हा दोष दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. पितृदोष म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यापासून सुटका करण्याचे उपाय पंडित पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वात आधी जाणून घेऊया पितृ दोष म्हणजे काय? असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार केले नाहीत किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीला तसेच त्याच्या संबंधित कुटुंबातील सदस्यांना अनेक पिढ्या पितृदोषाचा त्रास सहन करावा लागतो.

पितृदोषामुळे कशामुळे होतो?

पितरांचे योग्य अंत्यसंस्कार व श्राद्ध न करणे, पितरांचा अपमान करणे, घरातील स्त्रियांचा आदर न करणे, प्राण्यांची हत्या करणे, ज्येष्ठांचा अपमान करणे अशा अनेक कारणांमुळे पितृदोष होतो.

पितृदोषाची लक्षणे कोणती

आपण ज्या समस्यांमधून जात आहोत ते पितृदोषामुळे तर नाही ना हे अनेकदा कळू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर त्याची कारणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पितृदोषामुळे तुम्हाला किरकोळ वाटणारी समस्या असण्याची शक्यता आहे.पितृदोषामुळे व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अपत्यप्राप्तीचे सुख मिळत नाही. नोकरी आणि व्यवसायात कष्ट करूनही नुकसान सहन करावे लागते. कुटुंबात अशांतता आहे आणि एखाद्या व्यक्तीचे आरोग्य खराब राहते. जीवनातील शुभ कार्यात अडथळे येतात.

पितृदोष दूर करण्याचे उपाय

  • संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि नाग स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र सूक्त किंवा पितृ स्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र पठण करावे. यामुळे पितृदोषातही शांती मिळते.
  • प्रत्येक दिवशी प्रमुख देवता आणि कुटुंब देवतेची पूजा करा. असे केल्याने पितृदोषही कमी होतो.
  • भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा आणि श्रीमद भागवत गीता पठण करा, यामुळे पितरांची शांती होते आणि दोष कमी होतात.
  • पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजयाच्या मंत्राने भगवान शिवाला अभिषेक करावा.
  • घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आपल्या दिवंगत कुटूंबीयांचे फोटो लावा, त्यावर हार घाला आणि त्यांची रोज पूजा करा. असे केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो.
  • रोज नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ करा. हनुमान चालिसाचे पठण केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
  • तुमच्या दिवंगत नातेवाईकांच्या निर्वाण तिथीला गरजूंना किंवा ब्राह्मणांना अन्नदान करा. तुमच्या दिवंगत नातेवाईकांच्या आवडीनुसार जेवण बनवा.
  • दररोज पितृ कवच पठण करा, असे केल्याने पितृदोषात शांती मिळते.
  • आपल्या क्षमतेनुसार गरीबांना कपडे आणि अन्न इत्यादी दान करा. असे केल्याने हा दोषही दूर होतो.
  • दुपारी पिंपळाच्या झाडाला पाणी, फुले, अक्षत, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पण करा आणि आपल्या दिवंगत नातेवाईकांचे स्मरण करा आणि त्यांचे आशीर्वाद मागा.
  • पूर्वजांच्या नावाने फलदायी, सावलीची झाडे लावा. यामुळे दोषही कमी होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.