AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitrudosh Upay : पितृदोष असल्यास करावा लागतो या समस्यांचा सामना, या उपायांनी मिळतो लाभ

ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष (Pitrudosh Upay) असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोषामुळे कुटुंबात समस्यांची मालिका सुरू होते.

Pitrudosh Upay : पितृदोष असल्यास करावा लागतो या समस्यांचा सामना, या उपायांनी मिळतो लाभ
पितृदोषImage Credit source: Social Media
| Updated on: May 26, 2023 | 10:07 AM
Share

मुंबई : पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घराची भरभराट होते, पण पितरांचा कोप झाला तर पितृदोषाचा फटका अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष (Pitrudosh Upay) असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोषामुळे कुटुंबात समस्यांची मालिका सुरू होते. पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनात दिसून येतात. अशा स्थितीत काही उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि घरात सुख परत येऊ शकते.

पितृ दोषाची लक्षणे काय आहेत?

पत्रिकेत पितृदोष असल्यास व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कधी केलेलं कामही बिघडतं. व्यवसायापासून नोकरीपर्यंत सरळ्याच गोष्टीत तोटा होऊ लागतो.

वैवाहिक जीवनात येतात समस्या

घरातील पितृदोषामुळे खूप प्रयत्न करूनही दाम्पत्याला संततीचे सुख मिळत नाही. किंवा जन्मलेली मुले मंद, अपंग इ. काही वेळा मूल जन्माला येताच त्याचा मृत्यू होतो. या चिन्हांवरून घरात पितृदोष असल्याचे दिसून येते. घरात राहणाऱ्या लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मतभेद, भांडणे होत असतात. घरात उपस्थित सदस्यांपैकी एक ना एक आजारी पडतो. वैवाहिक जीवनात अडथळे येतात. कुटुंबालाही अपघातांना सामोरे जावे लागते. या सर्व लक्षणांवरून घरात पितृदोष असल्याचे दिसून येते.

पितृदोष टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत

जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पूर्वजांचा फोटो दक्षिण दिशेला लावा. यासोबत रोज पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करावे. दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. यासोबतच फुले, अक्षत, दूध, गंगेचे पाणी आणि काळे तीळही अर्पण करून पितरांचे स्मरण करावे. रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा. रोज दिवा लावणे शक्य नसेल तर पितृपक्षाच्या वेळी जरूर लावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब मुलींचे लग्न लावा. कुणाच्या लग्नात मदत केल्याने पितृदोषही दूर होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.