Pitrudosh Upay : पितृदोष असल्यास करावा लागतो या समस्यांचा सामना, या उपायांनी मिळतो लाभ

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

|

Updated on: May 26, 2023 | 10:07 AM

ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष (Pitrudosh Upay) असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोषामुळे कुटुंबात समस्यांची मालिका सुरू होते.

Pitrudosh Upay : पितृदोष असल्यास करावा लागतो या समस्यांचा सामना, या उपायांनी मिळतो लाभ
पितृदोष
Image Credit source: Social Media
Follow us

मुंबई : पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घराची भरभराट होते, पण पितरांचा कोप झाला तर पितृदोषाचा फटका अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष (Pitrudosh Upay) असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोषामुळे कुटुंबात समस्यांची मालिका सुरू होते. पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनात दिसून येतात. अशा स्थितीत काही उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि घरात सुख परत येऊ शकते.

पितृ दोषाची लक्षणे काय आहेत?

पत्रिकेत पितृदोष असल्यास व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कधी केलेलं कामही बिघडतं. व्यवसायापासून नोकरीपर्यंत सरळ्याच गोष्टीत तोटा होऊ लागतो.

वैवाहिक जीवनात येतात समस्या

घरातील पितृदोषामुळे खूप प्रयत्न करूनही दाम्पत्याला संततीचे सुख मिळत नाही. किंवा जन्मलेली मुले मंद, अपंग इ. काही वेळा मूल जन्माला येताच त्याचा मृत्यू होतो. या चिन्हांवरून घरात पितृदोष असल्याचे दिसून येते. घरात राहणाऱ्या लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मतभेद, भांडणे होत असतात. घरात उपस्थित सदस्यांपैकी एक ना एक आजारी पडतो. वैवाहिक जीवनात अडथळे येतात. कुटुंबालाही अपघातांना सामोरे जावे लागते. या सर्व लक्षणांवरून घरात पितृदोष असल्याचे दिसून येते.

हे सुद्धा वाचा

पितृदोष टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत

जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पूर्वजांचा फोटो दक्षिण दिशेला लावा. यासोबत रोज पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करावे. दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. यासोबतच फुले, अक्षत, दूध, गंगेचे पाणी आणि काळे तीळही अर्पण करून पितरांचे स्मरण करावे. रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा. रोज दिवा लावणे शक्य नसेल तर पितृपक्षाच्या वेळी जरूर लावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब मुलींचे लग्न लावा. कुणाच्या लग्नात मदत केल्याने पितृदोषही दूर होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI