Shardiya Navratri 2021 : नवरात्रोत्सव का साजरा केला जातो? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व

नवरात्रीचा पवित्र उत्सव आजपासून 7 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे असतात. असे मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये जो दुर्गा मातेची मनापासून पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या नऊ दिवसांसाठी देवी दुर्गाची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा केली जाते.

Shardiya Navratri 2021 : नवरात्रोत्सव का साजरा केला जातो? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व
Goddess-Durga
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 8:38 AM

मुंबई : नवरात्रीचा पवित्र उत्सव आजपासून 7 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे असतात. असे मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये जो दुर्गा मातेची मनापासून पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या नऊ दिवसांसाठी देवी दुर्गाची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा केली जाते.

घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला नवरात्रीला सुरुवात होते. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी नवरात्रोत्सव गुरुवार 07 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यावेळी नवरात्रीत दोन तिथी पडल्यामुळे 8 दिवसांची आहे.

नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. वर्षात चार वेळा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. शारदीय नवरात्र हे असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रामध्ये त्याच्याशी संबंधित दोन पौराणिक कथा प्रचलित आहेत. पौराणिक इतिहास आणि नवरात्रीचे महत्त्व जाणून घेऊया –

पहिली कथा –

पहिल्या आख्यायिकेनुसार, देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. ज्याने ब्रह्माजींना त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न केले होते. महिषासुराने ब्रह्माजींकडे वरदान मागितले होते की कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवर राहाणारा व्यक्ती त्याला मारु शकणार नाही. ब्रह्माजींच्या वरदानानंतर त्याने पृथ्वीवर दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गा देवीचा जन्म झाला. देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला.

दुसरी कथा –

दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, रामाने रामेश्वरम येथे नऊ दिवस देवी दुर्गाची पूजा केली होती. देवी दुर्गा प्रसन्न झाली आणि श्री रामाला विजयाचा आशीर्वाद दिला. यानंतर, दहाव्या दिवशी रामाने रावणाशी युद्ध करत त्याचा वध केला आणि लंकेवर विजय मिळवला, म्हणून दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shardiya Navratri 2021 | नवरात्रीचे उपवास करताय? मग या गोष्टी जाणून घ्या

Shardiya Navratri 2021 : दुर्दैवाला सुदैवात बदलायचं असले तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या या 5 मंत्रांचा जप नक्की करा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.