Shravan 2022: स्वयंभू आहे त्रंबकेश्वरचे जोतिर्लिंग, पौराणिक कथा आणि महत्त्व

त्र्यंबकेश्वर मंदिर अतिशय प्राचीन आहे. मंदिराच्या आत एका छोट्या खड्ड्यात तीन छोटी शिवलिंगे आहेत. ही तीन शिवलिंगे ब्रह्मा, विष्णू आणि शिव म्हणून ओळखली जातात. त्र्यबंकेश्वर मंदिराजवळ तीन पर्वत आहेत, जे ब्रह्मगिरी, निलगिरी आणि गंगा द्वार म्हणून ओळखले जातात.

Shravan 2022: स्वयंभू आहे त्रंबकेश्वरचे जोतिर्लिंग, पौराणिक कथा आणि महत्त्व
त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 9:24 AM

सध्या श्रावण (Shravan 2022) महिना सुरू असून या महिन्यात शिवमंदिरात पूजा करण्याची आणि दर्शन घेण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी  एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwar jyotirlinga) हे नाशिकजवळ आहे. या मंदिराच्या संदर्भात असे मानले जाते की, येथे स्थित शिवलिंग स्वतः प्रकट झाले होते. म्हणजेच ते कोणी स्थापित केले नव्हते. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे.  देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्र्यंबकेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी येतात आणि येथे भगवान भोलेनाथाची विशेष पूजा करतात. पहाटे साडेपाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत या शिवमंदिरात भाविक दर्शन घेऊ शकतात. या शिवमंदिराच्या पौराणिक कथा (Historical Story) आणि इतिहासाबद्दल जाणून घेऊया

पौराणिक कथा

प्रचलित असलेल्या आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी ब्रह्मगिरी पर्वतावर देवी अहिल्येचे पती ऋषी गौतम यांनी वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. या परिसरात असे अनेक ऋषी होते जे गौतम ऋषींचा हेवा करत होते आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते. एकदा सर्व ऋषींनी गौतम ऋषींवर गायींच्या हत्येचा आरोप केला. या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी गंगा देवीला येथे आणावे लागेल, असे सर्वांनी सांगितले. त्यानंतर गौतम ऋषींनी शिवलिंगाची स्थापना करून पूजा सुरू केली. ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव आणि माता पार्वती तेथे प्रकट झाले. देवाने वरदान मागायला सांगितले. तेव्हा गौतम ऋषींनी गंगा देवीला त्या ठिकाणी पाठवण्यासाठी शिवाकडे वरदान मागितले. देवी गंगा म्हणाली की, जर शिव देखील या ठिकाणी थांबले तर ती देखील येथेच राहील. भगवान शिवाने गंगेच्या विनंतीवरून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे वास्तव्य करण्याचे मान्य केले आणि गंगा नदी गौतमीच्या रूपाने तेथे वाहू लागली. गोदावरी हे गौतमी नदीचे नाव आहे.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघेही शिवलिंगात एकत्र बसलेले आहेत

त्र्यंबकेश्वर मंदिर अतिशय प्राचीन आहे. मंदिराच्या आत एका छोट्या खड्ड्यात तीन छोटी शिवलिंगे आहेत. ही तीन शिवलिंगे ब्रह्मा, विष्णू आणि शिव म्हणून ओळखली जातात. त्र्यबंकेश्वर मंदिराजवळ तीन पर्वत आहेत, जे ब्रह्मगिरी, निलगिरी आणि गंगा द्वार म्हणून ओळखले जातात. ब्रह्मगिरी हे शिवाचे रूप मानले जाते. नीलगिरी पर्वतावर निलंबिका देवी आणि दत्तात्रेय गुरु यांचे मंदिर आहे. गंगा द्वार पर्वतावर गोदावरी किंवा गंगा देवीचे मंदिर आहे. मूर्तीच्या पायातून पाण्याचे थेंब थेंब थेंब पडतात, जे जवळच्या तलावात जमा होते.

हे सुद्धा वाचा

मंदिरात कसे जायचे

या मंदिरात जाण्यासाठी नाशिक गाठावे लागते. नाशिक सर्व प्रमुख शहरांशी हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने जोडलेले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकपासून 29 किमी अंतरावर आहे. येथून मंदिरात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.