AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूर्खांना कसं दूर ठेवायचं? चाणक्यांनी सांगितलेला शंभर नंबरी फॉर्म्युला

चाणक्यांच्या सल्ल्यांमध्ये जीवनाचं सार आहे, जे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडू शकते. मूर्ख लोकांच्या सहवासापासून बचाव, विश्वासार्हतेची तपासणी, योग्य मित्रांची निवड आणि व्यक्तिगत गोष्टी इतरांपासून लपवणे या सर्व गोष्टी आपल्याला सकारात्मक जीवन जगण्यास मदत करतात.

मूर्खांना कसं दूर ठेवायचं? चाणक्यांनी सांगितलेला शंभर नंबरी फॉर्म्युला
चाणक्य निती
| Edited By: | Updated on: Nov 17, 2024 | 8:04 PM
Share

आयुष्य हे कधीच सोप्पं नसतं. जीवनाला अनेक गुंतागुंतीचे पदर असतात. आपल्या सभोवतालचे लोक विविध स्वभाव आणि गुणांनी भरलेले असतात. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांनी काही लोकांशी कसे वागावे, त्यांच्याशी कसा व्यवहार करावा आणि मित्र बनवताना काय लक्षात ठेवावे याबद्दल काही महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. चाणक्यांचं हे मार्गदर्शन जीवनात अंगीकारल्यास आपण नको त्या व्यक्तींना आपल्या आयुष्यापासून दूर ठेवू शकतो.

१. मूर्खांशी वाद घालू नका

आचार्य चाणक्य सांगतात की, मूर्ख व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांच्यात विचार करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालून वेळ आणि ऊर्जा वाया जाते. या व्यक्तींना चुकीचे आणि योग्य काय हे समजत नाही. त्यांच्याशी वाद घालणे केवळ मानसिक ताण निर्माण करेल. त्यामुळे मूर्ख लोकांपासून जितके लांब राहता येईल तितकेच उत्तम.

२. अविश्वासूंशी मैत्री नकोच

काही लोक तुमच्याशी बसून बोलतात, परंतु तुमच्या महत्वाच्या गोष्टी किंवा चिंता, कळकळीशी त्यांना किंचितही घेणंदेणं नसतं. या प्रकारच्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. हे लोक कधीही तुमच्या पाठीमागे धोका देऊ शकतात. अशा लोकांपासून सावध रहा आणि त्यांच्याशी तुमच्या व्यक्तिगत गोष्टी शेअर करणे टाळा, असं चाणक्य आवर्जुन सांगतात.

३. त्यांच्याशी मैत्री नको

आपल्यापेक्षा उच्च आणि नीच दर्जाच्या लोकांशी मैत्री करणे योग्य नाही. उच्च दर्जाच्या व्यक्तींशी मैत्री केल्यास आपल्याला स्वतःच कमीपणाची भावना येऊ शकते, तर नीच दर्जाच्या लोकांसोबत राहिल्यास आपल्या जीवनात सतत संघर्ष आणि अडचणी येतील. दोन्ही प्रकारच्या लोकांपासून दूर राहून, समतोल आणि सकारात्मक मैत्री करा.

४. पडती बाजू शेअर करु नका

प्रत्येक व्यक्तीला काही मर्यादा असतात, प्रत्येकाच्या काही पडत्या बाजू असतात, परंतु ते आपल्या जवळच्या लोकांसोबतही खूपच विचारपूर्वक शेअर करावं. आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यास ते लोक त्याचा फायदा घेत जाऊ शकतात. आपल्या अशा गोष्टींना गुप्त ठेवा, जेणेकरून त्यांचा वापर इतर लोक न करता तुम्हाला अपयशी ठरवू शकतील, असं चाणक्य स्पष्टपणे सांगतात.

५. मूर्खांच्या बदनामीला घाबरु नका

सर्व लोकच आपल्याला चांगले समजतात या भ्रमात राहू नका. काही लोक तर आपली खोटी बदनामी करत असतात. अशावेळी तुम्ही मूर्ख लोकांच्या बोलण्यामुळे खचून जाऊ नका. त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा शांतपणे जीवन जगा. मूर्ख लोकांच्या पुढे तुम्ही काय करणार? त्यांचा पिंजरा ओलांडून आपलं जीवन पुढे चालवा.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.