AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2022 : दिवाळीत सूर्यग्रहण; कधी सुरु होणार आणि कधी संपणार हे ग्रहण?

देशाच्या राजधानीसोबत हे ग्रहण जयपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि द्वारका येथूनही दिसणार आहे.

Surya Grahan 2022 : दिवाळीत सूर्यग्रहण; कधी सुरु होणार आणि कधी संपणार हे ग्रहण?
| Updated on: Oct 25, 2022 | 7:56 AM
Share

नवी दिल्ली : दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज 25 ऑक्टोबरला देशात आणि जगात सूर्यग्रहण होणार आहे. 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण(Surya Grahan 2022 ) आहे. हे ग्रहण भारतातील काही शहरांमधून पाहता येणार आहे. हे ग्रहण म्हणजे दुर्मिळ खगोलीय घटना आहे. कारण, असे ग्रहण पुढील दशकभर भारतातून दिसणार नाही. देशाच्या राजधानीसोबत हे ग्रहण जयपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि द्वारका येथूनही दिसणार आहे.

ग्रहणकाळात भारतातील लोकांना फक्त 43 टक्के मंद सूर्यच दिसणार आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नेमक कसं असत आंशिक सूर्यग्रहण

सूर्य हा आपल्या कक्षेत फिरत असतो. मात्र, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा आपण सूर्य पाहू शकत नाही. या खगोलीय स्थतीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्याच्या काही किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.

अशा प्रकारचे सूर्यग्रहण भारतात 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसणार आहे.

ग्रहण कधी सुरु होणार आणि कधी संपणार

भारतातील वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:29 वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण सुमारे 04 तास 03 मिनिटे चालणार आहे. संध्याकाळी 6.32 वाजता ग्रहण संपणार आहे.

कोणत्या शहरात किती वाजता दिसणार ग्रहण

शहरग्रहणाटी वेळ
मुंबईदुपारी 4,49
नागपूरदुपारी 4,49
दिल्ली दुपारी 4.29
चेन्नई सायंकाळी 5.14
हैदराबाद दुपारी 4.59
जयपूर दुपारी 4.31
कोलकाता दुपारी 4.52
द्वारका दुपारी 4.36
सिलीगुडी दुपारी 4.41
तिरुवनंतपुरम सायंकाळी 5.29
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.