AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2022 : दिवाळीत सूर्यग्रहण; कधी सुरु होणार आणि कधी संपणार हे ग्रहण?

देशाच्या राजधानीसोबत हे ग्रहण जयपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि द्वारका येथूनही दिसणार आहे.

Surya Grahan 2022 : दिवाळीत सूर्यग्रहण; कधी सुरु होणार आणि कधी संपणार हे ग्रहण?
| Updated on: Oct 25, 2022 | 7:56 AM
Share

नवी दिल्ली : दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज 25 ऑक्टोबरला देशात आणि जगात सूर्यग्रहण होणार आहे. 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण(Surya Grahan 2022 ) आहे. हे ग्रहण भारतातील काही शहरांमधून पाहता येणार आहे. हे ग्रहण म्हणजे दुर्मिळ खगोलीय घटना आहे. कारण, असे ग्रहण पुढील दशकभर भारतातून दिसणार नाही. देशाच्या राजधानीसोबत हे ग्रहण जयपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि द्वारका येथूनही दिसणार आहे.

ग्रहणकाळात भारतातील लोकांना फक्त 43 टक्के मंद सूर्यच दिसणार आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नेमक कसं असत आंशिक सूर्यग्रहण

सूर्य हा आपल्या कक्षेत फिरत असतो. मात्र, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा आपण सूर्य पाहू शकत नाही. या खगोलीय स्थतीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्याच्या काही किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.

अशा प्रकारचे सूर्यग्रहण भारतात 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसणार आहे.

ग्रहण कधी सुरु होणार आणि कधी संपणार

भारतातील वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:29 वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण सुमारे 04 तास 03 मिनिटे चालणार आहे. संध्याकाळी 6.32 वाजता ग्रहण संपणार आहे.

कोणत्या शहरात किती वाजता दिसणार ग्रहण

शहरग्रहणाटी वेळ
मुंबईदुपारी 4,49
नागपूरदुपारी 4,49
दिल्ली दुपारी 4.29
चेन्नई सायंकाळी 5.14
हैदराबाद दुपारी 4.59
जयपूर दुपारी 4.31
कोलकाता दुपारी 4.52
द्वारका दुपारी 4.36
सिलीगुडी दुपारी 4.41
तिरुवनंतपुरम सायंकाळी 5.29
Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.