AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teachers Day 2023 : एक विद्यार्थी परत करू शकतो का शिक्षकाचे ऋण? काय सांगतात आचार्य चाणाक्य

Teachers Day 2023 ज्ञानाच्या रूपात संपत्तीशिवाय जीवनात कधीही यश मिळत नाही आणि माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीद्वारे जीवनातील शिक्षकाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे.

Teachers Day 2023 : एक विद्यार्थी परत करू शकतो का शिक्षकाचे ऋण? काय सांगतात आचार्य चाणाक्य
आचार्य चाणाक्यImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 05, 2023 | 8:28 AM
Share

मुंबई : आपल्या जीवनात शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. आज 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन (Teachers Day 2023) आहे चाणक्य नीतीच्या एका श्लोकात आचार्य चाणक्य यांनी ज्ञानाला अमूल्य संपत्ती म्हटले आहे. याचे कारण असे की ज्ञानाच्या रूपात संपत्तीशिवाय जीवनात कधीही यश मिळत नाही आणि माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीद्वारे जीवनातील शिक्षकाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे. कारण शिक्षकाशिवाय विद्यार्थी ज्ञान प्राप्त करू शकत नाही. विद्यार्थ्याचे पहिले शिक्षक हे त्याचे पालक असतात, नंतर शिक्षक आणि शाळेनंतरचे जीवनातील अनुभव हे शिक्षकांचे रूप घेतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या गुरूंचे ऋण फेडू शकतो का? हे जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी याबद्दल काय सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी गुरु आणि शिष्य याविषयी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत

एकेम्वाक्षरं यस्तु गुरुः शिष्यं प्रबोध्येत ।

पृथ्वीं नास्ति तद्द्राव्यं यद् दत्त्वा चैनरिणी भवेत् ।

या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य सांगत आहेत की, गुरु म्हणून एका अक्षराचेही ज्ञान कोणी दिले तरी त्याचे तुमच्या जीवनात गुरूचे स्थान निर्माण होते. त्यांना त्यांच्या ऋणातून मुक्त करण्यासाठी या पृथ्वीतलावर अजून एकही योग्य गोष्ट निर्माण झालेली नाही. म्हणून माणसाने नेहमी गुरू आणि आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. तसेच ज्यांनी तुम्हाला आयुष्यात एक योग्य व्यक्ती बनवले आहे अशा सर्व लोकांना आपण नेहमीच आदर आणि सन्मान दिला पाहिजे.

सुखार्थी चेत् त्यजेद्विद्याम् त्यजेद्विद्याम् विद्यार्थीम् चेत् त्यजेत्सुखम् ।

सुखार्थिन: कुतो विद्या, कुतो विद्यार्थी: सुखम्.

चाणक्य नीतीच्या या श्लोकात आचार्य चाणक्य सांगत आहेत की ज्या विद्यार्थ्याला केवळ सुखाची इच्छा आहे त्याने शिक्षणाचा त्याग करावा. याशिवाय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आनंदाचा विचारही करू नये. याचे कारण असे की जे विद्यार्थी अजूनही आनंदाच्या शोधात आहेत त्यांना शिक्षण हे ओझे वाटते आणि ते सतत संघर्ष करतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच ज्ञान मिळवायचे आहे, सर्व अडचणींवर मात करून आपले ध्येय गाठायचे आहे ते जीवनात नक्कीच यशस्वी बनतात.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...