AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवघरात या 5 वस्तू ठेवल्याने घरात होऊ शकतात वाद अन् कटकट, आत्ताच काढून टाका

घरातील शांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी वास्तुशास्त्रील काही नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातीलच एक म्हणजे देवघरात ठेवलेल्या वस्तू. काहीवेळेला देवघरात नकळत अशा काही वस्तू आपण ठेवतो ज्यामुळे घरात नकारात्मकता पसरू शकते. घरात वाद होऊ शकतात. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या देवघरातून काढून टाकल्या पाहिजे हे जाणून घ्या.

देवघरात या 5 वस्तू ठेवल्याने घरात होऊ शकतात वाद अन् कटकट, आत्ताच काढून टाका
These items should never be kept in the templeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 12:32 PM
Share

आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये वास्तुची भूमिका फार महत्त्वाची असते. बऱ्याचदा, वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने अनेक समस्या टाळता येतात. तसेच काही वेळेला नकळत केलेल्या चुका देखील नकारात्मक परिणाम देऊ शकतात. म्हणून, वास्तुचे नियम योग्यरित्या समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

वास्तुशास्त्रात घरतील प्रत्येक वस्तूसाठी आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यासाठी वास्तू टीप्स सांगितल्या आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी वास्तुशास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे देवघर. पूजा आणि विधींशी संबंधित देखीस काही वास्तु टिप्स आहेत जे घरात शांती राखण्यास मदत करतात. शास्त्रांनुसार देवघरात काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. त्या वस्तूंचा नकळत घरातील वातावरणावर प्रभाव पडतो. चला तर मग जाणून घेऊयात. त्या वस्तू कोणत्या आहेत ते.

या वस्तू देवघरात कधीही ठेवू नयेत

1. देवघरात कधीही तुटलेली किंवा भंग पावलेली मूर्ती ठेवू नये. जर मूर्तीचा कोणताही भाग तुटला असेल तर तो ताबडतोब काढून टाका. जर परवानगी असेल तर जवळच्या मंदिरात नेऊन ठेवावी किंवा स्वच्छ पाण्यात विसर्जीत करावी. अशी मूर्ती प्रार्थना कक्षात ठेवणे म्हणजे वास्तुदोष मानला जातो.

2. प्रार्थना कक्षात कधीही कोणत्याही तीक्ष्ण वस्तू ठेवू नका. असे केल्याने घरात खूप नकारात्मक ऊर्जा येते. ही नकारात्मकता अनेकदा विनाशाकडे नेते. म्हणून, प्रार्थना कक्षाजवळून अशा कोणत्याही वस्तू असतील तर त्या काढून टाका.

3. हिंदू धर्मात, पूजेदरम्यान शंख वाजवण्याचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्याचा आवाज जिथे पोहोचतो तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतो. लक्षात ठेवा की प्रार्थना कक्षात कधीही एकापेक्षा जास्त शंख नसावेत.

4. स्वच्छतेच्या नावाखाली लोक देवघरात मळलेले कापड वापरतात. पूजास्थळ नेहमीच स्वच्छ असले पाहिजे. म्हणून, तिथे मळलेले किंवा फाटलेले कपडे टाकणे योग्य नाही. असं केल्याने घराची शांती भंग होते.

5. मंदिरात कधीही माचिस ठेवू नका. प्रार्थना कक्षात माचिस ठेवल्याने नकारात्मकता येते. माचिस बॉक्स तुम्ही प्रार्थना कक्षापासून दूर ठेवणे चांगले. तसेच जळलेली म्हणजे वापरलेल्या माचिसच्या काड्या देखील प्रार्थना कक्षाजवळ ठेवू नयेत. त्याचाही विपरीत परिणाम होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.