AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या परिस्थितींमध्ये चुकून ही परिधान करू नका रुद्राक्ष, जाणून घ्या याबद्दल काही महत्त्वाचे नियम

आपल्या सनातन धर्मात रुद्राक्ष ला एक पवित्र बीज मानले गेले आहे, तसेच कोणत्या ग्रहाला कोणता रुद्राक्ष धारण केल्यास फलदायी आहे आणि कोणता रुद्राक्ष धारण केल्याने कोणते फायदे होतात याबद्दल आपण अनेकदा वाचत किंवा ऐकत असतो.

या परिस्थितींमध्ये चुकून ही परिधान करू नका रुद्राक्ष, जाणून घ्या याबद्दल काही महत्त्वाचे नियम
rudrakshaImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 14, 2024 | 6:08 PM
Share

धर्मशास्त्रानुसार भगवान शिवाला रुद्राक्ष अत्यंत प्रिय असून जे रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शंकराची विशेष कृपा असते. असे म्हटले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून होते आणि म्हणूनच ते खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते. आपल्या सनातन धर्मात रुद्राक्ष ला एक पवित्र बीज मानले गेले आहे, तसेच कोणत्या ग्रहाला कोणता रुद्राक्ष धारण केल्यास फलदायी आहे आणि कोणता रुद्राक्ष धारण केल्याने कोणते फायदे होतात याबद्दल आपण अनेकदा वाचत किंवा ऐकत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही अशा काही परिस्थितीत रुद्राक्ष धारण करणे टाळावे जेणेकरून तुम्हाला त्याचे दोष लागणार नाही. चला तर मग जाणून घ्या महत्वाचे नियम.

रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. असे म्हणतात की रुद्राक्ष धारण केलेल्या व्यक्तीला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातून नकारात्मकता दूर होते. याशिवाय रुद्राक्ष धारण केल्याने सर्व संकटे नष्ट होतात. यासोबतच ग्रहांची अशुभताही दूर होते.

रुद्राक्ष आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पण प्रत्येकाला रुद्राक्ष घालता येईल असे नाही. ते परिधान करण्याचे काही नियम आहेत, ज्याचे पालन केल्यावरच त्याचे शुभ फळ मिळते. त्यामुळे तुम्हाला कोणत्या ज्योतिषाने सांगितल्या शिवाय चुकूनही रुद्राक्ष घालू नये.

धार्मिक मान्यतेनुसार गरोदर महिलांनी रुद्राक्ष धारण करू नये. गरोदर स्त्रीने रुद्राक्ष धारण केला असेल तर बाळाच्या जन्मानंतर सूतक पाळी संपेपर्यंत तो काढून ठेवा.

मांसाहार, सिगारेट आणि मद्यपान करताना चुकून ही रुद्राक्ष धारण करू नका हे नेहमी लक्षात ठेवा. यामुळे रुद्राक्षाचे पावित्र्य तर बिघडतेच, पण असे केल्याने विपरित परिणाम देणार्‍या राशीच्या जीवनावर ही परिणाम होऊ शकतो.

मान्यतेनुसार, झोपल्यानंतर शरीरात अशुद्धता येते. रुद्राक्षाच्या शुद्धतेवर ही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढावा. ज्योतिषाचार्यांच्या मते, झोपताना रुद्राक्ष उशीखाली ठेवल्यास मन शांत होते आणि वाईट, भीतीदायक स्वप्ने ही टळतात.

रुद्राक्ष धारण करताना चुकूनही रुद्राक्ष काळ्या धाग्यात असू नये याची विशेष काळजी घ्या. रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात परिधान करावा. याशिवाय रुद्राक्षाला कधीही अशुद्ध हातांनी स्पर्श करू नये आणि आपला रुद्राक्ष इतर कोणालाही परिधान करण्यासाठी देऊ नये.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.