AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या परिस्थितींमध्ये चुकून ही परिधान करू नका रुद्राक्ष, जाणून घ्या याबद्दल काही महत्त्वाचे नियम

आपल्या सनातन धर्मात रुद्राक्ष ला एक पवित्र बीज मानले गेले आहे, तसेच कोणत्या ग्रहाला कोणता रुद्राक्ष धारण केल्यास फलदायी आहे आणि कोणता रुद्राक्ष धारण केल्याने कोणते फायदे होतात याबद्दल आपण अनेकदा वाचत किंवा ऐकत असतो.

या परिस्थितींमध्ये चुकून ही परिधान करू नका रुद्राक्ष, जाणून घ्या याबद्दल काही महत्त्वाचे नियम
rudrakshaImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 14, 2024 | 6:08 PM
Share

धर्मशास्त्रानुसार भगवान शिवाला रुद्राक्ष अत्यंत प्रिय असून जे रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शंकराची विशेष कृपा असते. असे म्हटले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून होते आणि म्हणूनच ते खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते. आपल्या सनातन धर्मात रुद्राक्ष ला एक पवित्र बीज मानले गेले आहे, तसेच कोणत्या ग्रहाला कोणता रुद्राक्ष धारण केल्यास फलदायी आहे आणि कोणता रुद्राक्ष धारण केल्याने कोणते फायदे होतात याबद्दल आपण अनेकदा वाचत किंवा ऐकत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही अशा काही परिस्थितीत रुद्राक्ष धारण करणे टाळावे जेणेकरून तुम्हाला त्याचे दोष लागणार नाही. चला तर मग जाणून घ्या महत्वाचे नियम.

रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. असे म्हणतात की रुद्राक्ष धारण केलेल्या व्यक्तीला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातून नकारात्मकता दूर होते. याशिवाय रुद्राक्ष धारण केल्याने सर्व संकटे नष्ट होतात. यासोबतच ग्रहांची अशुभताही दूर होते.

रुद्राक्ष आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पण प्रत्येकाला रुद्राक्ष घालता येईल असे नाही. ते परिधान करण्याचे काही नियम आहेत, ज्याचे पालन केल्यावरच त्याचे शुभ फळ मिळते. त्यामुळे तुम्हाला कोणत्या ज्योतिषाने सांगितल्या शिवाय चुकूनही रुद्राक्ष घालू नये.

धार्मिक मान्यतेनुसार गरोदर महिलांनी रुद्राक्ष धारण करू नये. गरोदर स्त्रीने रुद्राक्ष धारण केला असेल तर बाळाच्या जन्मानंतर सूतक पाळी संपेपर्यंत तो काढून ठेवा.

मांसाहार, सिगारेट आणि मद्यपान करताना चुकून ही रुद्राक्ष धारण करू नका हे नेहमी लक्षात ठेवा. यामुळे रुद्राक्षाचे पावित्र्य तर बिघडतेच, पण असे केल्याने विपरित परिणाम देणार्‍या राशीच्या जीवनावर ही परिणाम होऊ शकतो.

मान्यतेनुसार, झोपल्यानंतर शरीरात अशुद्धता येते. रुद्राक्षाच्या शुद्धतेवर ही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढावा. ज्योतिषाचार्यांच्या मते, झोपताना रुद्राक्ष उशीखाली ठेवल्यास मन शांत होते आणि वाईट, भीतीदायक स्वप्ने ही टळतात.

रुद्राक्ष धारण करताना चुकूनही रुद्राक्ष काळ्या धाग्यात असू नये याची विशेष काळजी घ्या. रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात परिधान करावा. याशिवाय रुद्राक्षाला कधीही अशुद्ध हातांनी स्पर्श करू नये आणि आपला रुद्राक्ष इतर कोणालाही परिधान करण्यासाठी देऊ नये.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.