Chanakya Niti : या गोष्टी ठरतात एखाद्या व्यक्तीच्या वाईट काळाचे कारण, जाणून घ्या चाणक्य नीति काय म्हणते ते

| Updated on: Jul 26, 2021 | 3:50 PM

चाणक्य यांच्या मते, कोणतीही व्यक्ती दुसर्‍यावर अवलंबून राहू नये. दुसर्‍यावर अवलंबून असलेले जीवन हे नरकासारखे आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही.

Chanakya Niti : या गोष्टी ठरतात एखाद्या व्यक्तीच्या वाईट काळाचे कारण, जाणून घ्या चाणक्य नीति काय म्हणते ते
आचार्य चाणक्य यांच्या मते, आपल्याला इतरांकडून मिळालेली मदत परत केली पाहिजे. त्याचप्रमाणे जर कोणी आपल्याशी दुष्कृत्य केले असेल तर आपणही त्याच्याशी दुष्कृत्य केले पाहिजे आणि तसे करण्यात कोणतेही पाप नाही.
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य यांची विचारसरणी सर्वसामान्यांपेक्षा थोडी वेगळी होती. त्यांनी लहान वयातच वेद आणि पुराणांचे ज्ञान घेतले. त्यांच्या कार्यक्षम राजकीय धोरणामुळे त्यांनी सामान्य बालकाला चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनविले. ते अर्थशास्त्र आणि रणनीतीमध्ये तज्ज्ञ होते. आयुष्यभर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. परंतु आजही लोकांना त्याचे नीतिशास्त्र वाचण्यास आवडते. (These things are the cause of a person’s bad times, know what the Chanakya policy says)

या पुस्तकात, जीवनातील सर्व पैलू सांगितले गेले आहेत. हे पुस्तक कोणत्याही व्यक्तीला यश मिळविण्याचा मार्ग बनू शकते. बर्‍याच लोकांना अद्याप या गोष्टी वाचण्यास आणि त्यांच्या आयुष्यातील धोरणांचे अनुसरण करण्यास आवडते. आचार्य चाणक्य यांनी सांगितले की जेव्हा एखाद्या व्यक्तीची वेळ खराब येते तेव्हा त्यामागील परिस्थिती काय असते, याबद्दल माहिती दिली आहे.

1. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्याची पत्नी मरण पावली तर ती व्यक्ती दुसरे लग्न करुन जीवन जगू शकते. पण म्हातारपणी बायकोचा मृत्यू त्याच्या दुर्दैवाचे कारण बनते.

2. चाणक्य यांच्या मते, कोणतीही व्यक्ती दुसर्‍यावर अवलंबून राहू नये. दुसर्‍यावर अवलंबून असलेले जीवन हे नरकासारखे आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही. धर्मग्रंथातसुद्धा, दुसऱ्यांच्या सहाऱ्याने जीवन जगणाऱ्या व्यक्तीचे नशीब वाईट मानले जाते.

3. जर एखादी व्यक्ती उधळपट्टी करण्यासाठी पैसे खर्च करत असेल तर याचा अर्थ असा होतो की, त्याच्यासाठी पैशाला महत्त्व नाही. असे लोक स्वभावाने भांडखोर आणि गर्विष्ठ असतात. हे लोक कोणत्याही व्यक्तीचा आदर करत नाहीत. अशा लोकांचा जेव्हा नाश होतो तेव्हा त्यांना समजत देखील नाही.

4. चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने मिळविलेले पैसे शत्रूंच्या हाती गेले तर त्याला दुप्पट त्रास होईल. एक तर त्याचे पैसे जातात आणि दुसरे म्हणजे शत्रू त्याचा वापर करतात.

5. काही गुण स्वतः व्यक्तीमध्येच येतात. हे कोठूनही शिकले जात नाहीत. एखाद्या व्यक्तीस मदत करणे, लोकांची सेवा करणे, योग्य-चुकीचे निर्णय घेणे. कोणीही हे गुण शिकवत नाही.

6. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तीच्या मनात पाप आणि लोभ आहे तो बाहेरून कितीही चांगला असो. वेळ आल्यावर त्याचे खरे वर्तन दाखवतो. अशा लोकांपासून अंतर ठेवा. (These things are the cause of a person’s bad times, know what the Chanakya policy says)

इतर बातम्या

दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर, आशिष शेलारांचा घणाघात

Video | जोशपूर्ण वातावरणात पोलिसांची परेड, मध्येच माकड आले अन् घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?