AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : पौर्णिमेच्या दिवशी करा काळ्या तिळाचा हा सोपा उपाय, शनिदोष होईल कायमचा दूर

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये वास्तुदोषासंदर्भात अनेक छोटे-छोटे उपाय सांगण्यात आले आहेत. जर घरात शनिदोष निर्माण झाला तर त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे शनिदोष दूर कसा करायचा? यासदंर्भात आज आपण एक छोटा उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : पौर्णिमेच्या दिवशी करा काळ्या तिळाचा हा सोपा उपाय, शनिदोष होईल कायमचा दूर
shani devImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 02, 2026 | 8:51 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार नकळत आपल्या हातून काही चुका होतात, त्यामुळे घरात वास्तुदोष, शनिदोष सारखे दोष निर्माण होतात. जेव्हा घरात असे दोष निर्माण होतात, तेव्हा त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा केवळ तुमच्यावरच होत नाही, तर तुमच्या संपूर्ण घरादारावर होतो. जेव्हा घरात शनिदोष निर्माण होतो, तेव्हा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, अचानक धनहानी होते, काहीही कारण नसताना घरात वादविवाद होतात, शनिदोष नेमका कशामुळे निर्माण होतो तर त्यासाठी अनेक कारण आहेत, जसं की पश्चिम दिशा ही शनिदेवाची दिशा आहे, ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवली गेली पाहिजे,जर या दिशेला काही अडचण असेल किंवा ही दिशा अस्वच्छ असेल तरी घरात शनिदोष निर्माण होतो, तसेच शनिवारच्या दिवशी लोखंड किंवा मीठ खरेदी करू नये, त्यामुळे देखील घरात शनिदोष निर्माण होतो, आज आपण काळ्या तिळाशी संबंधित काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील शनिदोष दूर होऊन, तुमच्यावर शनिदेवाची कृपा होईल.

वास्तुशास्त्रानुसार दर महिन्याच्या पौर्णिमेला जर पाण्यात काळे तीळ घालून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शनिदेवांची कृपादृष्टी प्राप्त होते, तसेच घरातील सर्व वास्तुदोष देखील दूर होतात. शनिदोषही नाहीसा होतो. एवढंच नाही तर पौर्णिमेच्या दिवशी तिळाच्या पाण्यानं अंघोळ केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

जसं आपण पौर्णिमेला तिळाच्या पाण्यानं अंघोळ करतो तसंच जर एखाद्या घरात शनिदोष असेल किंवा एखाद्या व्यक्तीला शनिपिडा असेल तर अशा व्यक्तीने दररोज अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ घालून जर त्या पाण्यानं अंघोळ केली तर शनिदेव प्रसन्न होतात, शनिदोष नष्ट होतो. एवढंच नाही तर अचानक येणारे सर्व प्रकारचे संकट देखील टळतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

जर तुम्हाला शनिदोष असेल तर दर शनिवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करा, त्यानंतर शनि मंदिरात जाऊन शनिदेवांचं दर्शन करा, शनिदेवांना तेल तसेच काळे तीळ अर्पण करा, यामुळे देखील शनिदोष दूर होतो. ज्या व्यक्तींना शनिदेवांची साडेसाती आहे, अशा व्यक्तीने दररोज हनुमानाचं दर्शन करावं, त्यामुळे देखील शनिदोष दूर होतो. तसेच दररोज सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा व पिंपळाला प्रदक्षिणा घालाव्यात, यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....