AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : या कारणांमुळे घरात निर्माण होतो शनिदोष, जाणून घ्या सोपे उपाय

ग्रहांमध्ये शनि देवांना विशेष महत्त्व आहे. शनि देव जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात, तेव्हा ते त्याला भरभरून देतात, मात्र काही चुकांमुळे घरात शनिदोष निर्माण झाला तर मात्र तुम्हाला अनेक अडचणी देखील येऊ शकतात, आज आपण शनिदोषाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : या कारणांमुळे घरात निर्माण होतो शनिदोष, जाणून घ्या सोपे उपाय
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 17, 2025 | 9:08 PM
Share

ग्रहांमध्ये शनि देवांना विशेष महत्त्व आहे. शनि देवांना न्यायाची देवता असं देखील म्हटलं जातं. शनि देव हे नेहमी व्यक्तींना आपल्या कर्मानुसार फळ देत असतात. त्यामुळे कर्म नेहमी चांगले ठेवावेत असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात शनिची साडेसाती येते, साडेसाती म्हणजे असा काळ असतो, की त्या काळात तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात, तुम्हाला अचानक नुकसान देखील होऊ शकतं. मात्र साडेसाती सुरू असताना तुम्ही जर नियमित शनि महाराजांची सेवा केली, त्यांची प्रार्थना केली, त्याचसोबत आणखी काही सोपे उपाय केले तर तुमच्यावर शनि महाराजांची कृपा सदैव राहते आणि तुम्हाला शनि साडेसातीचा त्रास देखील होत नाही. वास्तुशास्त्रात देखील शनिदोष दूर करण्यासंबंधी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्रानुसार अशा काही छोट्या -छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या घरात शनिदोष निर्माण होऊ शकतो, ज्याचा मोठा फटका तुम्हाला बसण्याची शक्यता असते, जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

नैऋत्य दिशा – नैऋत्य दिशा अर्थात दक्षिण -पश्चिम दिशा ही शनिदेवांची दिशा मानली जाते, याच दिशेला सुख -शांती आणि आर्थिक स्थैर्यचं प्रतिक देखील मानलं जातं. मात्र तेव्हा तुमच्या घराची नैऋत्य दिशा ही अस्वच्छ असते, या दिशेला घरातील काही टाकावू वस्तू किंवा भंगार पडलेले असेल, तर तुमच्या घरात शनिदोष निर्माण होतो. त्यामुळे घराची नैऋत्य दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं.

पाण्याशी संबंधित वस्तू – नैऋत्य दिशेला कधीही पाण्याशी संबंधित वस्तू ठेवू नये, जसं की पाण्याची टाकी, माशांचा टँक इत्याही, अशा गोष्टी नैऋत्य दिशेला ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे,त्यामुळे घरात शनिदोष निर्माण होतो. अचानक काही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शनिदोष टाळण्यासाठी नैऋत्य दिशेला पाण्याशी संबंधित वस्तू ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

आरसा – नैऋत्य दिशेला आरसा ठेवणं टाळवं, कारण नैऋत्य दिशेला आरसा ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतात. घरात काहीही वाद नसताना भांडणं होतात, आर्थिक स्थैर्य राहत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....