AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: घराच्या या दिशेला लावा दिवा, आयुष्यात कधीच पैशांची कमी पडणार नाही

वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला देखील अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घरात काही ठिकाणी दररोज दिवा लावत असाल तर त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो, आणि अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते, आज आपण दिव्याचे काही नियम जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra: घराच्या या दिशेला लावा दिवा, आयुष्यात कधीच पैशांची कमी पडणार नाही
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 22, 2026 | 9:46 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की दररोज घरात पूजा, प्रार्थना केल्यामुळे सर्व प्रकारची नकारात्म ऊर्जा नष्ट होते, घरात सुख, शांती समृद्धी येते. तुम्ही जर दररोज देवाची पूजा करत असाल मनोभावे प्रार्थना करत असाल तर त्यामुळे तुमच्या मनाला देखील शांती मिळते. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळतं. मात्र कोणतेही धार्मिक विधी हे योग्य नियमानुसारच व्हायला हवेत, तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. त्यामुळे पूजेचे सर्व नियम समजून घेणं गरजेचं असतं. घरात सकाळी आणि संध्यांकाळी केल्या जाणाऱ्या पूजेचं विशेष महत्त्व असतं.सकाळी पूजा करताना देवाला जल, फूल, गंध आणि नवैद्य या गोष्टी अर्पण कराव्यात, या गोष्टींचं पूजेमध्ये विशेष महत्त्व असतं. तर सायंकाळच्या पूजेवेळी दिव्याचं विशेष महत्त्व असतं. आज आपण देवासमोर दिवा लावण्याचे योग्य नियम काय आहेत? तसेच देवघरासमोर तर दिवा लावला गेलाच पाहिजे, मात्र त्या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार घरात अन्य कुठे-कुठे दिवा लावणं शुभ आहे? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

घराचा मुख्य दरवाजा – वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य द्वारासमोर एक दिवा नित्यनियमाने लवला गेला पाहिजे. यामुळे घरात येणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते, त्यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात, आणि घरात सुख, शांती समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.

तुळशीजवळ लावा दिवा – तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे, ज्या घरात तुळस आहे, ज्या घरात नियमितपणे तुळशीची पूजा होते, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद राहतो. त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे सायंकाळच्यावेळी नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

या गोष्टी देखील लक्षात ठेवा – दिवा लावताना काही गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचं फळ मिळत नाही. दिवा लावताना दिव्यामध्ये नेहमी शुद्ध तेलच वापरावे, तसेच तुम्ही दिव्यासाठी जे तेल वापरणार आहात, ते तेल वेगळं ठेवावं, आणि त्याच तेलापासून दररोज तीन ठिकाणी तुमच्या देवघरासमोर, घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावावा, तसेच दिवा लावता दिव्याचं तोंड हे नेहमी पूर्व-पश्चिम असावं, दिवा कधीही दक्षिणेकडे तोंड करून लावू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.