AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Upay: वास्तुशास्त्रानूसार ‘या’ चुकीच्या सवयींमुळे होऊ शकते धनहानी, अनेकांना नाही माहिती

वास्तुशास्त्रानुसार माणसाच्या काही सवयी या कळत-नकळत नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. याचा परिणाम माणसाच्या आर्थिक परिस्थीतीवर होतो.

Vastu Upay: वास्तुशास्त्रानूसार 'या' चुकीच्या सवयींमुळे होऊ शकते धनहानी, अनेकांना नाही माहिती
वास्तू उपायImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 28, 2023 | 3:21 PM
Share

मुंबई, वास्तूशास्त्रामध्ये (Vastu Upay) अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे ज्याचा थेट परिणाम माणसाच्या जिवणावर होतो. दैनंदिन जिवनात आपण काही चुका करतो ज्याचा थेट परिणाम आपल्या जिवणावर होतो. बऱ्याचदा आपल्याला काही आर्थिक समस्यांनादेखील समोर जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार माणसाच्या काही सवयी या कळत-नकळत नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. याचा परिणाम माणसाच्या आर्थिक परिस्थीतीवर होतो. जाणून घेऊया वास्तूशास्त्रानुसार अशा कोणकोणत्या सवयी आहेत ज्या आर्थिक समस्येला कारणीभूत ठरतात. या चुका टाळल्यास धनहानी होणे थांबू शकते.

वास्तुशास्त्रानुसार या चुका ठरताता धनहानीसाठी कारणीभूत

स्वयंपाकघरातील खरकटी भांडी

खरकटी भांडी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नयेत असे आपण वऱ्याचदा घरातील मोठ्यांकडून ऐकले असेल. खरकटी भांडी घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते. रात्री स्वयंपाकाच्या ओट्यावर किंवा सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे घरात दारिद्र्य राहते.

पैश्यांचा अपव्यय

वास्तुशास्त्रानूसार जर तुम्ही अनावश्यकपणे पैसे खर्च करत असाल तर यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो. पैसा हा चंचल असतो. पैशाचा अनादर केल्यास आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. माणसाच्या आर्थिक हानीसाठी हेदेखिल एक कारण आहे.

संध्याकाळी घर झाडणे

वास्तुशास्त्रानूसार संध्याकाळी कधीही घर झाडू नये. कारण मान्यतेनुसार संध्याकाळी लक्ष्मी माता घरात येते आणि त्या वेळी घराच्या दारात कचरा आणि घाण असेल तर लक्ष्मी आल्या पावली परत जाते.

वर्तन किंवा आचरण

वास्तुशास्त्रानूसार जे ज्येष्ठ, विद्वान, महिला किंवा गरिबांना त्रास देतात किंवा त्यांचा सतत अपमान करतात, अशा घरात मां लक्ष्मी कधीही राहत नाही. जे इतरांशी वाईट वागतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी कोपलेली असते. त्यामुळे अशा चुका करणे अवश्य टाळावे. धनहानीसाठी हेदेखील एक कारण आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.