AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूनंतर पहिल्या 13 दिवसांमध्ये आत्मा कोण-कोणत्या अवस्थेमधून जातो, पाहा गरुड पुराण काय सांगतं?

गरुड पुराणात करण्यात आलेल्या दाव्यानुसार व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं तर त्या व्यक्तीचा आत्मा त्याच्या शरीराचा त्याग करतो. त्यानंतर आत्म्याला कोण-कोणत्या अवस्थेमधून जावं लागतं याची माहिती आज आपण घेणार आहोत.

मृत्यूनंतर पहिल्या 13 दिवसांमध्ये आत्मा कोण-कोणत्या अवस्थेमधून जातो, पाहा गरुड पुराण काय सांगतं?
गुरुड पुराण Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 9:42 PM
Share

हिंदू धर्मामध्ये 18 पुराणं आहेत, त्यामध्येच गरुड पुराणाचा देखील समावेश होतो, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा प्रवास नेमका कसा होतो? आत्म्याला कोण -कोणत्या अवस्थेमधून जावं लागतं? मृत्यूनंतर व्यक्तीचं नेमकं काय होतं? या सर्व गोष्टींचं वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आलं आहे. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते 13 व्या दिवसापर्यंत गरुड पुराण ऐकवलं जातं, त्यामुळे मृत आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं. दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कर्मानुसार तो स्वर्गात जाणार की नरकात हे ठरवलं जातं, व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा मिळते असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे व्यक्तीनं नेहमी आपले कर्म चांगले ठेवावेत असा सल्ला धर्मशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा प्रवास नक्की कसा होतो? याच वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आलं आहे, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

गरुड पुराणात करण्यात आलेल्या दाव्यानुसार व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं तर त्या व्यक्तीचा आत्मा त्याच्या शरीराचा त्याग करतो. मात्र जेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो तेव्हा तो लगेचच स्वर्गात पोहोचत नाही. तर मृत्यूच्या 13 दिवस व्यक्तीचा आत्मा हा पृथ्वीवरच असतो. गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा यमदूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला घेण्यासाठी येतात, तिथे त्याच्या पाप- पुण्याचा हिशोब होतो. त्यानंतर मृत्यूनंतर पुन्हा 24 तासांनी तो आत्मा पृथ्वीवर येतो. ज्या कुटुंबात त्याचा मृत्यू झाला आहे, त्याच कुटुंबात पुन्हा एकदा तो आत्मा येतो. जेव्हा यमदूत या आत्म्याला पृथ्वीवर पाठवतात तेव्हा तो 13 दिवस प्रेत अवस्थेमध्ये आपल्या प्रियजणांच्या आसपासच घुटमळत असतो.

जेव्हा त्याला आपला मृत्यू झाला आहे, आपण आपल्या शरीराचा त्याग केला आहे, याची जाणीव होते, तेव्हा आत्मा जोरजोरात ओरडून आपल्या प्रिय व्यक्तींना बोलण्याचा प्रयत्न करतो, असं गरुड पुराणामध्ये म्हटलं आहे. मात्र जेव्हा आत्म्याला याची जाणीव होते की आता आपण आपल्या शरीराचा त्याग केला आहे, तेव्हा त्याला खूप दु:ख होतं, असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप