AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे काशीचा डोम राजा? ज्याच्या आशिर्वादाने मिळतो प्रेतांना मोक्ष

बनारसच्या 80 घाटांपैकी दोन घाटांवर अंत्यसंस्कार केले जातात. मणिकर्णिका घाट आणि राजा हरिश्चंद्र घाट. या दोन्ही घाटांवर डोम राजाचे कुटुंब राहते. डोम राजाचे कुटुंब जळत्या मृतदेहांच्या सानिध्यात राहतात आणि या जळत्या मृतदेहांच्या चितेच्या आगीने त्यांच्या घराची चूल जळते.

कोण आहे काशीचा डोम राजा? ज्याच्या आशिर्वादाने मिळतो प्रेतांना मोक्ष
मनकर्णीका घाटImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 28, 2024 | 4:41 PM
Share

मुंबई : काशी एक असे शहर आहे जिथे अनेक हिंदू धर्मियांच्या भावना जुळलेल्या आहेत. काशीत शेवटचा श्वास घेतल्याने मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. काशीमध्ये जिथे मृत्यू आणि मोक्षाचे नाव येते, तिथे या नगरीच्या डोम राजाचे (Dom Raja) नाव अवश्य घेतले जाते. असे म्हणतात की डोम राजाच्या हातून मृत शरीरातील आत्म्यांना मुक्ती आणि मोक्ष प्राप्त होतो. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे डोम राजा आणि त्याचे नाव इतके प्रसिद्ध का आहे. असे म्हणतात की जेव्हा पृथ्वी संपेल तेव्हा विश्वात फक्त काशी शहरच उरले असेल. कर्म पूर्ण करून लोकं मोक्षप्राप्तीसाठी काशीला जातात. वाराणसीतील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा सर्वात प्रसिद्ध घाट मणिकर्णिका घाट आहे. इथल्या लोकांवर अंत्यसंस्कार करणाऱ्याला डोम राजा म्हणतात. काशीच्या चालीरीतींनुसार मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते.

डोम राजा कोण आहे?

बनारसच्या 80 घाटांपैकी दोन घाटांवर अंत्यसंस्कार केले जातात. मणिकर्णिका घाट आणि राजा हरिश्चंद्र घाट. या दोन्ही घाटांवर डोम राजाचे कुटुंब राहते. डोम राजाचे कुटुंब जळत्या मृतदेहांच्या सानिध्यात राहतात आणि या जळत्या मृतदेहांच्या चितेच्या आगीने त्यांच्या घराची चूल जळते. या दोन्ही घाटांवर डोम जातीचे लोकंच मृतदेहांचे अंतिम संस्कार करतात. या जातीचे लोकं समाजात अस्पृश्य मानले जातात पण त्यांच्या हातून मेलेल्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.

डोम राजाला पृथ्वीचा यमराज देखील म्हणतात जो मृत शरीरांवर अंत्यसंस्कार करतो आणि त्यांना मोक्ष प्राप्त करण्यास मदत करतो. त्यांची जीवनशैली सामान्य लोकांपेक्षा काहीशी वेगळी आहे. त्यांच्या घरातील स्टोव्हची आग जळत्या चितेतून घेतली जाते ज्यावर त्यांचे कुटुंबीय अन्न शिजवतात आणि खातात. मणिकर्णिका घाटावर शेवटच्या प्रवासासाठी देशभरातून लोक येतात. या घाटाला मोक्षाचा घाट असेही म्हणतात.

डोम राजाच्या हातूनच मोक्ष का मिळतो?

प्रचलित आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शिव माता पार्वतीसोबत काशीला भेट देण्यासाठी आले. दरम्यान, मणिकर्णिका घाटावर स्नान करताना माता पार्वतीची एक अंगठी पडली, जी डोम नावाच्या राजाने स्वतःजवळ ठेवली होती. खूप शोधाशोध करूनही अंगठी सापडली नाही, त्यानंतर महादेव रागावले आणि त्यांनी अंगठी चोरणाऱ्याला नष्ट करण्याचा शाप दिला.

या शापाच्या भीतीने डोमने भोलेनाथ शंकर आणि माता पार्वतीची माफी मागितली, त्यानंतर भगवान शिवाने राजा डोमला शापातून मुक्त केले आणि त्याला स्मशानभूमीचा राजा घोषित केले. असे म्हणतात की तेव्हापासून डोम राजा आणि त्यांचे वंशज स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम करू लागले. मान्यतेनुसार, डोम राजाच्या वंशाला डोम राजा म्हणतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.