AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरात्रीत येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी का म्हणतात? असे आहे महत्त्व

पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने  चामुंडा या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीत येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी का म्हणतात? असे आहे महत्त्व
महाअष्टमीImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 04, 2023 | 6:30 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, एका वर्षात चार नवरात्र असतात, त्यापैकी दोन प्रामुख्याने साजरे होतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र. चैत्र नवरात्र चैत्र महिन्यात येते, तर शारदीय नवरात्र आश्विम महिन्यात साजरी केली जाते. या काळात माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यंदा शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबरपासून सुरू होत असून 24 ऑक्टोबरला संपणार आहे. या काळात अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे, ज्याला महाअष्टमी (Mahaashtami) असेही म्हणतात. या दिवशी माता दुर्गेचे आठवे रूप गौरीची पूजा केली जाते.  गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीत महाअष्टमीला इतके महत्त्व का आहे?

महाअष्टमी का असते विशेष

पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने  चामुंडा या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असेही म्हटले जाते. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचे दीर्घायुष्य वाढते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना  गौरीला लाल चुनरीही अर्पण केली जाते.

देशभरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत असली तरी पश्चिम बंगालमध्ये त्याचे विशेष महत्त्व दिसून येते. महाअष्टमीच्या दिवशी ठिकठिकाणी मोठमोठे मंडप उभारले जातात आणि विशेष पूजा केली जाते. महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशीही रास गरबा नृत्य केले जाते. नवमी तिथीला राम नवमी असेही म्हणतात. या दिवशी कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यामध्ये दुर्गेच्या 9 रूपांचे प्रतीक म्हणून 9 मुलींना घरी बोलावून प्रेमाने खाऊ घातले जाते. असे मानले जाते की कन्या पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद कुटुंबावर सदैव राहतो.  अशा स्थितीत दोन्ही तिथींना विशेष महत्त्व आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.