AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरातून घरी आल्यानंतर हातपाय का धुवू नयेत? शास्त्र काय सांगतं?

सनातन धर्मात नियमित पूजा करणे आवश्यक मानले जाते. त्यातीलच एक नियम म्हणजे मंदिरात जाण्यापूर्वी हात-पाय का धुवावेत आणि मंदिरातून परत आल्यानंतर लगेच हात-पाय धुवू नयेत. त्यामागे बरीच कारण आहेत जी फार कोणाला माहित नसतील. चला जाणून घेऊयात त्यामागे नक्की काय शास्त्र आहे ते. 

मंदिरातून घरी आल्यानंतर हातपाय का धुवू नयेत? शास्त्र काय सांगतं?
Why should not we wash our hands and feet after coming home from the templeImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 05, 2025 | 1:31 PM
Share

सनातन धर्मात नियमित पूजा करणे आवश्यक मानले जाते. काहीजण नियमित मंदिरात जातात तर काहीजण वारानुसार. तसेच प्रत्येकाची भक्ती अन् पूजा करण्याची पद्धतही वेगळी असते. काही लोक पूर्ण शिस्त आणि विधींनी पूजा करतात. तर काही जण फक्त हात जोडून प्रार्थना करतात. पण श्रद्धा आणि भक्ती यामुळे आयुष्यातील अडचणी कमी होतात. कारण पूजा करताना फक्त हेतू शुद्ध मानला जातो. जर मन स्वच्छ असेल तर सर्व काही बरोबर आहे.

देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर पाय धुवू नयेत

दरम्यान वास्तुशास्त्रात काही नियम आहेत जे मंदिरात जाताना आणि मंदिरातून परतताना लक्षात ठेवले पाहिजेत. असाच एक नियम आहे तो म्हणजे मंदिरातून परतल्यानंतर हातपाय धुणे. शास्त्रातल्या नियमाप्रमाणे मंदिरात जाण्याआधी पाय धुणे महत्त्वाचे असते तर मंदिरातून देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर पाय धुवू नयेत असे म्हटले जाते. त्यामागे काही कारणे सांगितली आहेत.

हातपाय धुणे योग्य आहे का?

शास्त्रांनुसार, दर्शन घेण्यापूर्वी मंदिरात जाऊन पाय धुणे योग्य आहे कारण आपण रस्त्याने येताना कधीकधी अशा ऊर्जा सोबत घेऊन येतो किंवा ज्या लोकांचा ओरा फारच नकारात्मक असतो अशी लोक वाटेत भेटतात त्यामुळे आपल्या एनर्जीवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मंदिरात जाण्याआधी त्याच्या आसपास पाण्याचा स्त्रोत असेल तर नक्कीच हात-पाय धुवून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण शांत मनाने देवतेचे स्मरण करू शकतो.

मंदिरातून परतल्यानंतर हातपाय का धुवू नये?

काही लोक मंदिरातून परतल्यानंतर सवयी प्रमाणे हातपाय धुतात. शास्त्रांमध्ये हे योग्य मानले जात नाही. जेव्हा आपण मंदिरातून घरी परततो तेव्हा आपण त्या देवाचे दर्शन घेतल्यानंतर ठिकाणाची सकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत घरी आणतो. अशा परिस्थितीत, जेव्हा हातपाय धुतले जातात तेव्हा ही ऊर्जा खराब होते किंवा पूर्णपणे नष्ट होते. मंदिरातून परतल्यानंतर, हातपाय लगेच धुण्याऐवजी, काही वेळाने ते धुवावेत.

या गोष्टीही लक्षात ठेवा

शास्त्रांनुसार, मंदिरातून परतताना आपण काही इतर गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही लोक मंदिरातून परतल्यानंतर दुसरीकडे जातात. त्याऐवजी, तुम्ही घरी परत यावे आणि थोडा वेळ शांत राहावे. जर तुम्ही मंदिरातील शिवलिंगाला पाणी अर्पण केले असेल तर रिकामे भांडे घरी आणू नका. मंदिरातूनच थोडेसे पाणी त्यात भरा. घरी परतल्यानंतर ते प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही) 

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार