Do You Know | जेवणाच्या थाळीत तीन चपात्या ठेवणे अशुभ का मानलं जातं? जाणून घ्या…

| Updated on: Mar 27, 2021 | 2:56 PM

खाण्याच्या थाळीत एकावेळी तीन चपात्या वाढल्या जात नाहीत (Why Three Rotis Do Not serve At A Time Know The Reason Behind This Manyata).

Do You Know | जेवणाच्या थाळीत तीन चपात्या ठेवणे अशुभ का मानलं जातं? जाणून घ्या...
Thali
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन प्रमुख देवता म्हणून मानले जातात (Three Rotis Do Not serve At A Time). यांना त्रिदेव म्हटलं जातं. यांना सृष्टीचे निर्माणकर्ता, पालनहार आणि संहारक मानलं जाते. त्यामुळे 3 हा अंक अतिशय शुभ असायला हवा. पण, पूजा-अर्चेनेत, अनेक विधींमध्ये तीनच्या अंकाला अशुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे खाण्याच्या थाळीत एकावेळी तीन चपात्या वाढल्या जात नाहीत (Why Three Rotis Do Not serve At A Time Know The Reason Behind This Manyata).

जर कोणी असं केलं तर घरातील वडिलधारी व्यक्ती याची मनाई करतात. कुठल्या रेस्टॉरंटमध्येही तुम्हाला कधीही एकसोबत तीन चपात्या दिल्या जात नाहीत. यांची संख्या एक, दोन, चार किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे आपल्या मनात हा प्रश्न नक्की येत असेल की तीनला इतकं अशुभ का मानलं जातं. चला जाणून घेऊया याबाबत –

तीन चपात्या म्हणजे मृतकाच्या भोजनाप्रमाणे

हिंदू धर्मात तीन चपात्या असलेली थाळी मृतकाच्या भोजनाप्रमाणे मानली जाते. कारण, कुणाच्या मृत्यूनंतर त्यांच्या त्रयोदशी संस्कारापूर्वी पहिले भोजनाची जी थाळी काढली जाते त्यामध्ये तीन चपात्या एकत्र ठेवल्या जातात. ही थाळी मृतकासाठी समर्पित असते आणि या थाळीला वाढणाऱ्या व्यतिरिक्त आणखी कुणीही पाहात नाही. त्यामुळे घरातील वृद्ध व्यक्ती थाळीत तीन चपात्या एकत्र ठेवण्यापासून रोखतात.

त्याशिवाय, अशी देखील मान्यता आहे की एकत्र तीन चपात्या ठेवून भोजन करणाऱ्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्या व्यक्तीप्रती शत्रुतेचा भाव उत्पन्न होतो

वैज्ञानिक कारणंही जाणून घ्या

जर वैज्ञानिक दृष्टीने पाहायचं झालं तर बहुतेक आरोग्य विशेषज्ञांची मते, सामान्य व्यक्तीला दिवसभरात थोड-थोड करुन खायला हवं. अशात एकावेळिी भोजनाच्या थाळीत एक वाटी दाळ, एक वाटी भाजी, 50 ग्राम भात आणि दोन चपात्या त्याच्या गरजेसाठी पर्याप्त आहेत (Why Three Rotis Do Not serve At A Time Know The Reason Behind This Manyata).

याला संतुलित डायट मानलं जातं, कारण दोन चपात्यांनी एका व्यक्तीला 1200 ते 1400 कॅलरी ऊर्जा मिळते. एकावेळी यापेक्षा जास्त भोजन करणाऱ्या व्यक्तीला आरोग्या संबंधी अनेकप्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

Why Three Rotis Do Not serve At A Time Know The Reason Behind This Manyata

संबंधित बातम्या :

Vastu Tips | घरात याप्रकारे करा ‘मोर’ पंखाचा वापर, आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील तणाव होईल दूर

घरात असेल ‘शाळीग्राम’ तर ‘हे’ नियम कटाक्षाने पाळा, अन्यथा विपरित परिणाम होऊ शकतात

Omkareshwar Temple : भगवान शंकराच्या दर्शनासाठी प्रकट झाली नर्मदा नदी, श्रद्धेची अनोखी कहाणी