AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत हा जगातला सर्वोकृष्ट संघ, अफगाणिस्तानच्या कर्णधाराकडून कौतुक

विश्वचषक सामन्यातील अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत भारताने विश्वचषकातील सलग चौथा विजय नोंदवला. यानंतर सर्वच स्तरातून भारतीय संघाचे कौतुक होत आहे.

भारत हा जगातला सर्वोकृष्ट संघ, अफगाणिस्तानच्या कर्णधाराकडून कौतुक
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 23, 2019 | 11:02 AM
Share

लंडन : भारताने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत  विश्वचषकातील सलग चौथा विजय नोंदवला. मात्र, या विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले. शेवटच्या षटकामध्ये भारताच्या मोहम्मद शमीने विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक घेतल्याने भारताने ११ धावांनी विजय मिळवला आणि तमाम भारतीयांचा जीव भांड्यात पडला. यानंतर देशभरातून भारतीय संघाचे कौतुक होत आहे. हे कौतुक आता देशापुरते मर्यादित राहिले नसून खुद्द अफगाणिस्तान संघाचा कर्णधार गुलबदीन नईब यानेही पराभवानंतर भारतीय संघाची प्रशंसा केली. भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक असल्याचे मत नईबने व्यक्त  केले.

गुलबदीन नईबने अफगाणिस्तानसोबत झालेल्या सामन्यात भारताच्या विजयाचे श्रेय भारतीय संघाच्या सांघिक खेळीला दिले. तो म्हणाला, “अफगाणिस्तानविरुद्धच्या भारतीय विजयाचे श्रेय भारतीय गोलंदाजांना जाते. त्यांनी खूपच चांगली गोलंदाजी केली. बुमराह आणि शमी यांनी प्रभावी गोलंदाजी केली. धोनी आणि जाधवलाही या विजयाचे श्रेय जाते. भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक आहे.”

शनिवारी (22 जून) अत्यंत थरारक सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करुन आपला विजयरथ कायम राखला. मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अफगाणिस्ताननेही भारताला चांगली टक्कर देत शेवटच्या षटकापर्यंत झुंझ दिली. मात्र, भारतीय खेळाडूंच्या झंझावतासमोर ही झुंज अपुरी ठरली आणि भारताने विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम भारताला 224 धावांवरच रोखले. त्यानंतर मैदानात उतरुन शानदार फलंदाजी केली आणि काही काळ की होईना भारताच्या संघाला पराभवाच्या छायेत नेले. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत अखेरच्या षटकात विजय खेचून आणला. या थरारक सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने 4 फलंदाजांना तंबूत पाठवताना शेवटच्या निर्णायक षटकात हॅट्रिक घेतली. जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांनीही प्रत्येकी 2 खेळाडू बाद केले.

भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल असा अंदाज लावला जात असला, तरी अफगाणिस्तानच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजी चालली नाही. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट 67 धावांवर बाद झाला आणि मोठी धावसंख्या उभी राहण्याची आशा मावळली. लोकेश राहुल 30, विजय शंकर 29, एमएस धोनी 28 आणि केदार जाधवने 52 धावांचं योगदान दिलं.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला संघर्ष करायला भाग पाडलं. मुजीब उर रेहमानने 10 षटकांमध्ये केवळ 26 धावा देत एका फलंदाजाला माघारी धाडलं. गुलबदीन नायब आणि मोहम्मद नाबी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर राशीद खान, रहमत शाह आणि अफ्ताब आलम यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.

भारताच्या अनेक खेळाडूंनी जागतिक क्रमवारीत आपले स्थान निश्चित केले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, बुमराह अशा अनेक खेळाडूंचा दबदबा जागतिक क्रिकेटमध्ये आहे. त्यामुळे याचा परिणाम एकूणच भारतीय संघाच्या सांघिक कामगिरीवरही होत आहे.

Follow Us
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!