टीम इंडिया ज्या ठिकाणी खेळणार, तिथेच आले महाभंयकर संकट, थरकाप उडवणारा Video समोर

Asian Games 2026: आशियाई खेळ अवघ्या काही दिवसांवर आले आहेत पण ते होतील की नाही यावर जरा शंकाच व्यक्त केली जात आहे.

टीम इंडिया ज्या ठिकाणी खेळणार, तिथेच आले महाभंयकर संकट, थरकाप उडवणारा Video समोर
| Updated on: Sep 10, 2026 | 11:38 AM

Asian Games 2026: जपानमधील नागोया शहरातून एक मोठी बातमी येत आहे. २०२६ च्या आशियाई खेळांना सुरुवात होण्यास केवळ १० दिवस शिल्लक असताना, विक्रमी पावसामुळे शहरात हाहाकार माजला आहे. एका सोशल मीडिया पोस्टनुसार, रस्त्यांवर पाणी साचले असून वाहने पाण्यात बुडाली आहेत. इतकेच नाही, तर क्रीडांगणांच्या आजूबाजूलाही पाणी दिसत आहे. व्हिडिओंमधून गंभीर परिस्थिती दिसून येत आहे.

AP च्या वृत्तानुसार, मुसळधार पावसामुळे शहरात लेव्हल ५ चा पूर इशारा जारी करण्यात आला आहे. आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या फिलीपिन्ससह अनेक देशांतील सुमारे ४०० खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित, उंच ठिकाणी हलवण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू शिपिंग कंटेनरपासून बनवलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहत होते. शहरावर झालेल्या विनाशकारी परिणामांनंतरही, नागोयाचे महापौर इचिरो हिरोसावा यांनी सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे स्पष्टपणे सांगून लोकांना आणि खेळाडूंना धीर दिला आहे. काही क्रीडांगणांच्या छतातून पाणी गळत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, परंतु कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

महापौरांनी दावा केला आहे की आशियाई खेळ नियोजित वेळेनुसारच होतील आणि तयारीबद्दल चिंता करण्याची गरज नाही. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) भारताच्या ५०३ सदस्यीय संघासाठी एका भव्य निरोप समारंभाचे आयोजनही केले होते. अनेक भारतीय खेळाडू जपानमध्ये दाखल झाले आहेत किंवा त्यांच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहेत.

२०२३ च्या हांगझू आशियाई खेळांमध्ये भारताने १०६ पदके जिंकून इतिहास रचला होता. ही आजपर्यंतची भारताची आशियाई खेळांमधील सर्वोत्तम कामगिरी होती. त्यामुळे, २०२६ मध्ये भारतीय खेळाडू हा विक्रम मोडण्याचे आणि आणखी जास्त पदके जिंकण्याचे ध्येय ठेवतील.

एशियन्स गेम्समध्ये पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेला 24 सप्टेंबर 2026 पासून सुरुवात होणार असून  या स्पर्धेआधीच 23 जुलै 2026ला टी20 रॅकिंगच्या आधारावर टीम्सचे विभाजन केले. सगळ्यात खालच्या क्रमांकावर असलेल्या 6 टीम्सना नॉकआऊट स्टेजसाठी क्वालिफाय करावे लागणार. तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या देशांना आयसीसी रॅकिंगच्या आधारावर थेट क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री मिळाली आहे. एशियन्स गेम्समध्ये भारतीय संघाचा क्वार्टर फायनल सामना 28 सप्टेंबर 2026 ला खेळवला जाणार. आता ज्या ठिकाणी हा क्रिकेटचा सामना रंगणार आहे तिथेच हा पूर आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us