AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022: शेवटच्या 15 मिनिटात वर्षांची मेहनत वाया जातेय, भारतीय हॉकी संघ कुठे चुकतोय?

CWG 2022: बर्मिंघम मध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत आणि इंग्लंड मधला हॉकी सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या काही मिनिटात भारतीय हॉकी संघ गडबडतोय.

CWG 2022: शेवटच्या 15 मिनिटात वर्षांची मेहनत वाया जातेय, भारतीय हॉकी संघ कुठे चुकतोय?
indian-hockeyImage Credit source: PTI
| Updated on: Aug 02, 2022 | 4:09 PM
Share

मुंबई: बर्मिंघम मध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत आणि इंग्लंड मधला हॉकी सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या काही मिनिटात भारतीय हॉकी संघ गडबडतोय, यावर मात करण्यासाठी भारतीय हॉकी संघाला एक्सपर्टची मदत घेण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटच्या काही मिनिटात सामन्यावरील पकड सैल होणं आणि आपल्या गोलपोस्ट जवळ चुका केल्याने महत्त्वाची मेडल्स हातून निसटतायत. टोक्यो ऑलिम्पिक आणि यावर्षी आशिया कप मध्ये हे घडलय. इंग्लंड विरुद्ध चौथ्या क्वार्टर मध्ये शेवटच्या 15 मिनिटांचा खेळ पाहिल्यानंतर, सुधारणा झाली नाही, तर राष्ट्रकुल मध्येही त्याच चुकांची पुनरावृत्ती होऊ शकते.

अशा चूका नाही परवडणार

इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या क्वार्टर मध्ये टीम इंडियाकडे 3-1 अशी आघाडी होती. पण सामना संपल 4-4 असा बरोबरीत. शेवटच्या क्वार्टर मध्ये टीम इंडियाला फक्त 9 खेळाडूनिशी खेळावं लागलं. शेवटच्या काही मिनिटात भारताची सामन्यावरील पकड सैल झाली होती. गुरजंत सिंह धोकादायक पद्धतीने खेळत असल्याने 10 मिनिटं त्याला बाहेर बसवण्यात आलं. मोठ्या स्पर्धेतील सामवन्यात महत्त्वाच्या क्षणी अशा चुका कशा परवडू शकतात? याचं उत्तर संघ व्यवस्थानपाला शोधावं लागेल. कारण पहिल्यांदा होत नाहीय. चांगली बाब म्हणजे हा फक्त साखळी फेरीतील सामना होता. संघाकडे स्वत:ला सावरण्याची संधी होती.

टोक्यो ऑलिम्पिक मोठं उदहारण

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक मिळवलं. पण त्यावेळी सुद्धा झालेल्या काही चुकांमुळे पदकाचा रंग बदलला. सेमीफायनल मध्ये बेल्जियम विरुद्ध तिसऱ्या क्वार्टर मध्ये भारतीय हॉकी संघ 2-2 असा बरोबरीत होता. भारतीय संघ सुवर्ण किंवा रौप्यपदक जिंकेल असं वाटत होतं. पण शेवटच्या टप्प्यात बचाव इतका कमकुवत झाला की, बेल्जियमने 49, 53 आणि 60 व्या मिनिटाला गोल करुन सामन्याचा नूरच पालटला. यात दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. जर्मनी विरुद्ध जिंकून भारताने कांस्य पदक मिळवलं. पण त्यावेळी सुद्धा शेवटच्या काही मिनिटात टीम इंडिया गडबडली होती. तीसरा क्वार्टर मध्ये भारतीय संघ 5-3 असा आघाडीवर होता. भारतीय टीमने 48 व्या मिनिटाला जर्मनीला पेनल्टी कॉर्नर दिला. त्यामुळे सामना 5-4 असा संपला.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.