AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 Schedule | आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान सामना केव्हा?

Asia Cup 2023 Schedule Announced | आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालंय. स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि श्रीलंकेत करण्यात आलंय.

Asia Cup 2023 Schedule | आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान सामना केव्हा?
| Updated on: Jul 19, 2023 | 9:15 PM
Share

मुंबई | क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित आशिया कप 2023 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर प्रसिद्ध करण्यात आलंय. आशियाई क्रिकेट काउन्सिल अर्थात एसीसीप्रमुख आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आशिया कप स्पर्धेच्या मुख्य तारखा याआधीच जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं नव्हतं. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक कधी येणार, असा सवाल क्रिकेट चाहत्यांना पडला होता. आता प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांमध्ये हायब्रिड पद्धतीने करण्यात आलंय. स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 17 सप्टेंबरला महाअंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अधिक उत्सूकता आहे.

आशिया कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला केव्हा?

टीम इंडिया आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा सामना हा या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. साखळी फेरीतील हा हायव्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी इथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच टीम इंडिया आणि पाकिस्तानने सुपर 4 साठी क्वालिफाय केलं तर पुन्हा दोन्ही संघ 10 सप्टेंबरला आमनेसामने येतील.

एका ट्रॉफीसाठी 6 संघांमध्ये रस्सीखेच

आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ क्रिकेट टीमचा समावेश आहे. नेपाळची आशिया कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

टीम इंडियाच्या साखळी फेरीतील वेळापत्रक

2 सप्टेंबर, टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान.

5 सप्टेंबर, टीम इंडिया विरुद्ध नेपाळ.

बाद फेरीतील सामने

ए 1 विरुद्ध बी 2, 6 सप्टेंबर.

बी 1 विरुद्ध बी 2, सप्टेंबर.

ए 1 विरुद्ध ए 2 – 10 सप्टेंबर.

ए2 विरुद्ध बी 1 – 12 सप्टेंबर.

ए 1 विरुद्ध बी 1, 14 सप्टेंबर.

ए 2 विरुद्ध बी 2 – 15 सप्टेंबर.

महाअंतिम सामना – 17 सप्टेंबर.

स्पर्धेबाबत महत्वाची माहिती थोडक्यात

आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या स्पर्धेतील एकूण 11 सामने हे 50 ओव्हर्सचे असणार आहेत. स्पर्धेत सहभागी असणाऱ्या एकूण 6 संघांना एकूण 2 गटांमध्ये विभागण्यात आलंय.त्याननुसार टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. तर बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान टीम बी ग्रुपमध्ये आहेत.

दोन्ही संघातील प्रत्येक टीम ही एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. यामध्ये दोन्ही गटातून प्रत्येकी 2 संघ हे सुपर 4 साठी क्वालिफाय करतील. तर दोन्ही संघातून प्रत्येकी 1 अशा 2 संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्यानंतर सुपर 4 मध्ये प्रत्येक टीम उर्विरत 3 संघांविरुद्ध खेळेल. या सुपर 4 मधून अव्वल आणि दुसऱ्या स्थानी असलेले दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.