AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी थेट ड्रेसिंग रुममध्ये, निराश शमी सांत्वन केल्यानंतर म्हणाला…

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचं स्वप्न अंतिम सामन्यात भंग झालं. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्ट दिसत होतं. मैदानातील प्रेक्षक वर्गही शांत होता. असं सर्व भयाण वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेतली.

टीम इंडियाच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी थेट ड्रेसिंग रुममध्ये, निराश शमी सांत्वन केल्यानंतर म्हणाला...
निराश टीम इंडियाच्या खेळाडूंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढवलं मनोबळ, शमीने ट्वीट करत सांगितलं...
| Updated on: Nov 20, 2023 | 4:39 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप जेतेपद भारतच जिंकणार असा प्रत्येक भारतीयाला वाटत होतं. पण अंतिम सामन्यात भ्रमनिरास झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाचं तिसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. कर्णधार रोहित शर्मा याला तर अश्रू अनावर झाले. मैदानातून थेट ड्रेसिंग रुममध्ये धाव घेत त्याने भावनांना मोकळी वाट करून दिली. एकंदरीत मैदानात अशी स्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेट घेतली. इतकंच काय तर खेळाडूंचं मनोबळ देखील वाढवलं. या दरम्यान त्यांनी मोहम्मद शमीला मिठीत घेतलं आणि निराश होऊ नका असं सांगितलं. मोहम्मद शमीने हा फोटो आता सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

काय म्हणाला मोहम्मद शमी?

‘दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडिया आणि माझं समर्थन केल्याप्रकरणी भारतीयांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये येऊन आमचं मनोबळ वाढवलं. त्यांचा मी आभारी आहे. आम्ही निश्चितपणे पुन्हा परतू आणि चांगली कामगिरी करू.’, असं ट्वीट मोहम्मद शमी याने केलं आहे.

मोहम्मद शमीला सुरुवातीच्या चार सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर शमीला संधी मिळाली. त्या संधीचं शमीने सोनं केलं. सात सामन्यात 24 गडी बाद करत अव्वल गोलंदाज ठरला. भारतासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम झहीर खानच्या नावावर होता.

फिरकीपटू रवींद्र जडेजा यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासोबत फोटो शेअर केला आहे.जडेजाने फोटो पोस्ट करताना लिहिलं आहे की, ‘संपर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी राहिली आहे. पण अंतिम फेरीत हवी तशी कामगिरी झाली नाही. टीम निराश होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये येऊन संघाचं मनोबळ वाढवलं.’

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?