AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: टॉस हरल्यामुळे होणारं नुकसान 5 पॉइंट मधून समजून घ्या, अशी आहे Playing-11

IND vs PAK: आशिया कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान मध्ये सुपर 4 फेरीचा सामना होत आहे. मागच्या रविवारी झालेल्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं.

IND vs PAK: टॉस हरल्यामुळे होणारं नुकसान 5 पॉइंट मधून समजून घ्या, अशी आहे Playing-11
India vs PakistanImage Credit source: social
| Updated on: Sep 04, 2022 | 7:34 PM
Share

मुंबई: आशिया कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान मध्ये सुपर 4 फेरीचा सामना होत आहे. मागच्या रविवारी झालेल्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. आजही भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याचवेळी पाकिस्तानही जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात टॉसही महत्त्वपूर्ण ठरु शकतो. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. टॉस हरल्यामुळे भारतीय संघाच नुकसान होऊ शकतं. या पाच पॉइंट मधून समजून घ्या.

अशी आहे भारताची प्लेइंग – 11

भारत – रोहित शर्मा,(कॅप्टन) केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल,

पाकिस्तानची प्लेइंग -11

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन-बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमां, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रऊफ, नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन

  1. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये हा सामना होत आहे. या पीचवर गवत आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. प्रथम फलंदाजी करणारा संघ अडचणीत येऊ शकतो.
  2. पीच मध्ये ओलसरपणा आहे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा मिळू शकतो. फलंदाजी करणं आव्हानात्मक असेल. सुरुवातीला विकेट गमावल्या तर संघ अडचणीत येऊ शकतो.
  3. पहिल्या डावात फिरकी गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. चेंडूला चांगला टर्न मिळेल. फलंदाजांना चेंडू खेळताना अडचणी येऊ शकता.
  4. खेळपट्टी फलंदाजांसाठी फार अनुकूल नाहीय. खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करणं सोपं नसेल.
  5. दुसऱ्याडावात दव पडू शकतो. अशा स्थितीत गोलंदाजी करणारी टीम अडचणीत येऊ शकते.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.