AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 : पाकिस्तानला झटका, BCCI ने पीसीबला दाखवून दिली जागा

Asia Cup 2023 : माज दाखवणाऱ्या पाकिस्तानला एकट पाडून दाखवलं. पाकिस्तानने विरोधात भूमिका घेतली, तर त्यात त्यांचच जास्त नुकसान आहे. कारण बीसीसीआयकडे आर्थिक शक्ती आहे.

Asia Cup 2023 : पाकिस्तानला झटका, BCCI ने पीसीबला दाखवून दिली जागा
ind vs pak world cup
| Updated on: May 08, 2023 | 1:58 PM
Share

लाहोर : आशिया कपच्या आयोजनावरुन भारताला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला बीसीसीआयने त्यांची जागा दाखवून दिलीय. पाकिस्तान आशियाई क्रिकेट वर्तुळात एकटा पडलाय. यावर्षी होणारी आशिया कप टुर्नामेंट पाकिस्तान बाहेर हलवण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डाला पाठिंबा दिलाय.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा एक मोठा झटका आहे. पाकिस्तान आपल्या देशात आशिया कपच आयोजन करण्यासाठी आग्रही होता. आशिया कप पाकिस्तान बाहेर जाणार असेल, तर बांग्लादेश आणि श्रीलंका दोन्ही देश ही टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी तयार आहेत, असं जिओ स्पोर्ट्सने म्हटलय.

बीसीसीआयने आधीच जाहीर केलेलं

बीसीसीआयने आधीच आशिया कपसाठी पाकिस्तानात टीम पाठवायला नकार दिला होता. पाकिस्तान ऐवजी तटस्थ ठिकाणी आशिया कपच आयोजन करावं, अशी बीसीसीआयची भूमिका होती. पीसीबीचे प्रमुख नजम सेठी म्हणाले की, “टुर्नामेंटच आयोजन दुसऱ्या देशात केलं, तर तिथे पाकिस्तान टीम खेळणार नाही”

पाकिस्तानने प्रतिआव्हान दिलं, पण…..

पाकिस्तान आशिया कपमध्ये खेळणार नसेल, तर आशियाई क्रिकेट काऊन्सिल संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्पर्धेत आयोजन करण्याचा विचार करु शकते. बीसीसीआयने आशिया कपसाठी पाकिस्तानात जाणार नाही, अशी भूमिका घेतली, तेव्हा पाकिस्तानने सुद्धा वर्ल्ड कपसाठी आम्ही भारतात येणार नाही, अंस जाहीर केलं. पाकिस्तानचच उलट नुकसान

बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम आहे. बीसीसीआयकडे आर्थिक ताकत आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध खेळला नाही, तर त्यात त्यांचच उलट नुकसान आहे. टीम इंडिया विरुद्ध सीरीजमध्ये अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डाचा फायदा असतो. त्यामुळे श्रीलंका, बांग्लादेश पाकिस्तानसोबत जाणार नाहीत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.